उत्तर प्रदेशमध्ये धर्मांतराचे धक्कादायक षड्यंत्र
लखनौ, वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातून धर्मांतराची सनसनाटी घटना समोर आली आहे. तेथील राशिद नावाच्या व्यक्तीच्या आधीच पाच पत्नी आहेत. असे असताना त्याने एका 19 वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण करून तिच्याशी लग्नगाठ बांधल्यामुळे हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
शामली जिल्ह्यातील आदमपूर येथील 19 वर्षीय तरुणी तीन महिन्यांपूर्वी सनौली नगला गावात आपल्या मामाकडे राहायला आली होती. गेल्या काही दिवसांपासून ती अचानकपणे बेपत्ता झाली. याबाबत नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. दरम्यान आरोपीने मुलीच्या घरच्यांना फोन करून तक्रार मागे घ्या; अन्यथा तुमच्या दुसर्या मुलीचेही अपहरण करून तिला घेऊन जाईन, अशी धमकी दिली.
याची माहिती मिळताच बजरंग दलाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करून आरोपीविरोधात कठोर कारवाईची जोरदार मागणी केली. 22 जूनपर्यंत मुलीची सुटका न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा बजरंग दलाने दिला आहे.
चार पत्नी हिंंदू, एक मुस्लिम
यातील आरोपीच्या एकूण पाच पत्नी आहेत. त्यातील एक मुस्लिम असून अन्य चौघी हिंदू आहेत. आरोपी धर्मांतर करण्याच्या उद्देशाने हिंदू महिलांना लक्ष्य करत असल्याची माहिती आंदोलन करणार्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. याप्रकरणी आरोपी राशिदविरुद्ध छपरौली पोलिस ठाण्यात अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी आता त्याच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा नोंद करून तपास सुरू केला केला आहे.