

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकमध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही. मुळात कर्नाटकमध्ये 1985 पासून कुठलेच सरकार रिपीट होऊ शकले नाही. मात्र,या निकालाचा महाराष्ट्र आणि देशाच्या निकालावर काहीही परिणाम होणार नाही.'मुंगेरी लाल के हसीन सपने ' कधी पूर्ण नाही होणार नाहीत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कर्नाटक निकालावर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.