Ravi Kishan : मला चार मुले ही कॉंग्रेसचा दोष; भाजप खासदार रवी किशन यांचं वक्तव्य
पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप खासदार आणि भोजपुरी अभिनेते रवी किशन (Ravi Kishan) यांचं एक वक्तव्य चर्चेत आले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, “काँग्रेसने लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणले असते तर आज मी 4 मुलांचा बाप नसतो”. भारतात वाढती लोकसंख्या ही एक समस्या बनली आहे. देशभरात खासगी विधेयक असलेल्या लोकसंख्या नियंत्रण विधेयकाची सध्या चर्चा (Population Control Bill) सुरु आहे. याच दरम्यान उत्तर प्रदेशमधील गोरखपूरचे भाजप खासदार आणि अभिनेते रवी किशन यांचं एक वक्तव्य खूप चर्चेत आले आहे.
एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कॉंग्रेस पक्षावर आरोप केला आहे. ते म्हणाले की, “मला चार मुले आहेत, माझा कोणताही दोष नाही. काँग्रेस सरकारने विधेयक आणले असते, कायदा असता तर आम्हाला चार अपत्ये झाली नसती.” रवी किशन यांना तीन मुली आणि एक मुलगा अशी चार अपत्यं आहेत.
काँग्रेस पक्षावर निशाणा
आधीच्या सरकारने या बाबतीत वाढत्या लोकसंख्येच्या बाबतीत अधिक दक्ष राहायला हवे होते. काँग्रेसच्या काळात लोकसंख्या नियंत्रणाबाबत जनजागृती झाली नाही, त्यामुळे आता भाजप सरकारला लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणावे लागले आहे. आता लोकसंख्या नियंत्रणाचा विचार केल्याने चार अपत्ये झाल्याचा पश्चाताप होत असल्याचे त्यांनी मान्य केले.
मला चार मुले आहेत. वडील म्हणून त्यांचे संगोपन मला माहीत आहे. माझा संघर्षही त्यांच्या संगोपनातच होता. ते पुढे म्हणाले की, चीनने लोकसंख्या नियंत्रित केली आहे. आपल्या देशातील पूर्वीची सरकारे विचारी असती तर पिढ्यानपिढ्या संघर्ष करावा लागला नसता. सध्याचे भाजप सरकार केवळ मंदिरेच बांधत नाही तर रस्तेही बांधत आहे.
हेही वाचा
- नगर : ना थकणार, ना झुकणार.. न्याय मिळाल्याशिवाय मागे नाही हटणार ! आ . लंके उपोषणाच्या निर्णयावर ठाम
- पिंपरी: धनंजय मुंडे यांच्या नावाखाली पैशाची मागणी, डीएमच्या ऑफिसमध्ये पैसे आणून दे म्हणत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ
- महाराष्ट्राला एक इंचही भूमी देणार नाही; कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांची दर्पोक्ती
- Intel layoff | जगभरात नोकरकपातीची लाट! आता इंटेल २०० कर्मचाऱ्यांना देणार नारळ, ३ महिने विनापगारी काम
- Sonia Gandhi Birthday : रणथंबोर अभयारण्यात सोनिया गांधींनी साजरा केला आपला ७६ वा वाढदिवस
महाराष्ट्राला एक इंचही भूमी देणार नाही; कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांची दर्पोक्ती https://t.co/cfZ9DIPcCFमहाराष्ट्राला-एक-इंचही-भूमी-देणार-नाही-कर्नाटकचे-मुख्यमंत्री-बोम्मई-यांची-दर्पोक्ती/ar #maharashtrabelongstokarnataka #maharashtraborder #basavrajbommai #pudharionline
— Pudhari (@pudharionline) December 10, 2022