भारतातील ५ जी कॉलचे आयआयटी मद्रासमध्ये यशस्वी परीक्षण
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताने गुरुवारी (दि.१९) ५ जी कॉलचे यशस्वी परीक्षण केले. केंद्रीय रेल्वे आणि संचार व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, आयआयटी मद्रासमध्ये ५ जी चे यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे. यामध्ये संपूर्ण नेटवर्क आणि डिझायन भारतातच तयार केले गेले आहे.
Aatmanirbhar 5G 🇮🇳
Successfully tested 5G call at IIT Madras. Entire end to end network is designed and developed in India. pic.twitter.com/FGdzkD4LN0
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) May 19, 2022
मंत्री वैष्णव यांनी ट्वीटच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली. तसेच त्यांनी एक व्हिडिओ देखिल पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ५ जीचे परीक्षण करणाऱ्या टीम सोबत ते दिसत आहेत. मंत्री वैष्णव यांच्या सोबत संपूर्ण टीम आनंद व्यक्त करताना दिसत आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, आयआयटी मद्रासच्या या टीमचा आम्हाला अभिमान व गर्व आहे. ज्यांनी ५ जी यंत्रणेला विकसित केले. यामुळे ५ जी डेव्हलपमेंट इकोसिस्टीम आणि हायपरलूप उपक्रमाला मोठ्या संधी उपलब्ध करुन देईल.