...तर राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, ब्रिजभूषण सिंह यांचा अल्टिमेटम | पुढारी

...तर राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, ब्रिजभूषण सिंह यांचा अल्टिमेटम

पुढारी ऑनलाईन डेस्क : “आम्ही पहिले अयोध्यावासी, नंतर भाजपाचे नेते आहोत. हम किसको छेडते नही है और छेडनेवालों को छोडते नही है. आधी शिव्या द्यायचा आणि आता कशाला उत्तर प्रदेशमध्ये येता? पहिल्यांदा उत्तर भारतीयांचा अपमान का केला? राज ठाकरेंना माझा एकट्याचा विरोध नाही, ही एक जनभावना आहे. हे आंदोलन राजकारण करण्यासाठी केलेले नाही. ठाकरेंना अयोध्येत घ्यायचं की ते महंत ठरवतील. त्यांना महंतांची माफी मागितली की, ठाकरेंचं अयोध्येत स्वागत करू”, असे मत भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मांडले.

उत्तर प्रदेशाच्या नंदिनीनगरमध्ये राज ठाकरेंच्या अयोध्याला विरोध करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत ब्रिजभूषण बोलत होते. ते पुढे म्हणाले की, “राज ठाकरेंनी संपूर्ण उत्तर प्रदेशची माफी मागण्याची गरज नाही. फक्त संत-महंतांची माफी मागितली तरीही आम्ही त्यांचं स्वागत करु. मी महाराष्ट्राचा आदर करतो. त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी सर्वांची भूमिका आहे. माफीशिवाय युपीत पाय ठेवू देणार नाही”, अशा इशारा ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना दिला आहे.

उत्तर भारतीयांना कट्टर विरोध करणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करत भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी नंदिनीनगरमध्ये मोठी रॅली काढली आहे. त्यांनी मोठ्या सभेचेदेखील आयोजन केलेले आहे. “राज ठाकरेंनी पहिल्यांदा माफी मागावी, तर अयोध्येमध्ये प्रवेश दिला जाईल अन्यथा उत्तर प्रदेशमध्ये त्यांना घुसू देणार नाही.  आम्ही उत्तर भारतीयांचा अपमान खपवून घेणार नाही”, अशी प्रतिक्रिया रॅलीमध्ये सहभागी झालेल्या उत्तर प्रदेशाच्या नागरिकांनी दिली आहे.

“राज ठाकरेंनी महाराष्ट्रातच राहावं, उत्तर प्रदेशमध्ये येऊ नये. त्यांनी माफी मागितली तरच त्यांना प्रवेश दिला जाईल. माफी मागितली नाही तर ‘छटी का दूध या दिलाएंगे”, असा इशाराही उत्तर प्रदेशच्या मंहतांनी राज ठाकरेंना दिला आहे. सभेमध्ये राज ठाकरेंविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहेत. ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर राज ठाकरे जाणार आहेत, त्यांना विरोध करण्यासाठी भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह रॅली आणि सभेचं आयोजन केलेले आहे. त्यांना वाढता प्रतिसाद मिळत आहेत.  “हे आंदोलन मागे घेण्यासाठी जे. पी. नड्डा आणि अमित शहांचा फोन येणार नाही”, असेही ब्रिजभूषण सिंह यांनी सांगितले आहे.

ब्रिजभूषण सिंह काय म्हणाले होते? 

“ज्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्यासारखे लोक जन्माला आले, त्याच  महाराष्ट्रात उत्तर भारतीयांना शिवीगाळ करणारा आणि त्यांना मारहाण करणारा राज ठाकरे नावाचा व्यक्ती जन्माला आहे. त्यामुळे अयोध्या दौऱ्याआधी माफी मागितली नाही तर उत्तर प्रदेशात घुसू देणार नाही”, असे धमकी भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना दिली आहे.

ब्रिजभूषण सिंह हे एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलत होते. ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज ज्या महाराष्ट्रात जन्मले त्या महाराष्ट्राची वेगळी ओळख आहे. मराठ्यांनी तर देशासाठी पानिपतपर्यंत येऊन युद्ध केले आहे. हा महाराष्ट्राचा अभिमानास्पद इतिहास आहे. शिवरायांच्या सैन्यात प्रत्येक जातीचे, त्यांच्या विश्वासाचे लोक होते. पण त्याच महाराष्ट्रात राज ठाकरेसारखी व्यक्ती जन्मते आणि मराठी माणूस व उत्तर भारतीय असा मुद्दा निर्माण करते.”

“महाराष्ट्रात राज ठाकरे अजानाचा विरोध करो किंवा हनुमानचालिसाचं पठण करतो, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. ही माझी वैयक्तिक भूमिका आहे. कारण, मी उत्तर भारतीय आहे. आणि राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांचा अपमान केला आहे. भगवान राम यांनी लहान करू नये, पण तेदेखील उत्तर भारतीयच होते. त्यांच्या वशंजांना मागील २० वर्षांपासून या व्यक्तीने सतत अपमानीत केलं आणि मारहाण केली, त्यासाठी राज ठाकरेंनी माफी मागावी. तर आम्हारा अयोध्येत येण्याला माझा आक्षेप नाही”, असे ब्रिजभूषण सिंह यांनी सांगितले.

“इतकंच नाही तर राज ठाकरेंनी अयोध्येत यावं, पण त्यांनी जे चुकीचं काम केलं, जे विष कालवून फूट पाडण्याचं काम केलं त्यासाठी माफी मागावी. कारण, त्यांच्या या भूमिकेमुळे अनेकांनी जीव गमावला आहे. माझ्याकडे त्यांची नावं आहेत. गरज भासली तर ती यादीदेखील देईल. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, खेद व्यक्त करावा. केवळ राजकारणासाठी माफी न मागता अयोध्येला येऊन दर्शन घेऊन फोटो काढून जाणार असाल, तर मी मात्र राज ठाकरे यांना उत्तरप्रदेशात घुसू देणाप नाही”, अशी धमकी ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना दिली आहे.

पहा व्हिडीओ : 2 वर्षात भोंगे, जेम्स लेन आठवावा असं काहीच घडलं नव्हतं 

Back to top button