नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणल्यानंतर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पीएम मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. यानंतर संजय राऊत यांनी पवार यांचे आभार मानले. शरद पवारांची भूमिका राष्ट्रासाठी महत्त्वाची असल्याचेही ते म्हणाले.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भाजप आणि तपास यंत्रणांवर कडाडून हल्ला चढवला. आयएनएस विक्रांत बोफोर्सपेक्षा मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला. इमोशनल ब्लॅकमेल करून सोमय्यांनी पैसे लाटले, फडणवीस त्यांची वकीली करत आहेत याचे आश्चर्य वाटते, असा टोलाही लगावला. फडणवीस नकली हिंदुत्वाचे पुरस्कर्ते अशी बोचरी टीका त्यांनी केली. सोमय्यांविरोधात नुसते आरोप नाहीत, तर पुरावे असल्याचेही ते म्हणाले.
ईडीच्या कारवाईने आपण घाबरणार नसून संपूर्ण ठाकरे परिवार पाठिशी असल्याचे ते म्हणाले. विरोधी पक्षांची एकजूट होत असून सिलेक्टेड लोकांना केंद्रीय यंत्रणाकडून टार्गेट केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. संसदेत माझ्यासारख्या माणसाला बोलू दिले जात नाही असेही ते म्हणाले.
हे ही वाचलं का ?