दिग्विजय सिंह यांना हिंसाचार प्रकरणी एक वर्षाची शिक्षा
भोपाळ; पुढारी ऑनलाईन : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना हिंसाचार प्रकरणी एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण 2011 मध्ये बीजेवायएमच्या कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याशी संबंधित आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्यासह ६ जणांना इंदूर जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांना एक वर्षाच्या शिक्षेसह ५ हजार दंडही ठोठावण्यात आला आहे.
दिग्विजय सिंह यांचे म्हणणे आहे की, हे १० वर्षे जुने प्रकरण असून त्यांना खोट्या प्रकरणात गोवण्यात आले आहे. यापूर्वी त्यांचे नाव एफआयआरमध्येही नव्हते. राजकीय दबावाखाली माझे नाव जोडण्यात आले आहे. आता आम्ही या प्रकरणी अपील करणार आहोत. विरुद्ध हाताला दुखापत असलेले चित्र उजव्या हाताला सांगितले असल्याचे वकील राहुल शर्मा यांनी सांगितले. सध्या त्यांना जामीन मिळाला असून, उच्च न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहे.
खटल्यानुसार, १७ जुलै २०११ रोजी उज्जैनमध्ये भाजयुमो कार्यकर्ते जयंत राव यांनी माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, त्यामुळे संतप्त दिग्विजय सिंह आणि बीजेवायएम कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. उज्जैन येथील माधव नगर पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
Madhya Pradesh | Former CM Digvijay Singh sentenced to one year by Indore District Court in Ujjain assault case
“This is a 10-year-old case in which my name was not even in the FIR, but was added later under political pressure. I will appeal in the High Court” he said pic.twitter.com/Klaru6lCB8
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) March 26, 2022
दिग्विजय सिंह यांच्याशिवाय माजी खासदार प्रेमचंद्र गुड्डू, तरानाचे आमदार महेश परमार, काँग्रेसचे अनंत नारायण सिंह आणि इतरांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदूरमधील लोकप्रतिनिधींच्या ३० क्रमांकाच्या विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी आणि निर्णय झाल्यामुळे दिग्विजय सिंह शनिवारी इंदूरला पोहोचले.
हे ही वाचलं का ?