'मुलींना शाळा कॉलेजमध्ये बिकिनी घालण्याची परवानगी आहे का ? असेल तर कोणत्या प्रकारची?'
पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकात सध्या सुरू असलेला हिजाब वाद प्रकरण वाढत चालले आहे. राजकारण्यांपासून ते बॉलीवूड स्टार्स यावर खुलेपणाने बोलताना दिसत आहेत. दरम्यान, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, महिलांना त्यांच्या मर्जीनुसार कपडे घालण्याचा अधिकार आहे. यावर अभिनेत्री शर्लिन चोप्राने त्याला प्रश्न विचारला आहे.
प्रियांका गांधी काय म्हणाल्या होत्या
कर्नाटकमध्ये सध्या सुरू असलेल्या हिजाबच्या वादावर प्रियंका गांधी यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, बिकिनी असो, बुरखा असो, जीन्सची जोडी असो किंवा हिजाब असो, तिला काय घालायचे आहे हे ठरवण्याचा अधिकार महिलांचा आहे. भारतीय घटनेने आम्हाला हमी दिली आहे. महिलांचा छळ थांबवा. तसेच मुलगी आहे लढू शकते हॅशटॅग वापरला होता.
Whether it is a bikini, a ghoonghat, a pair of jeans or a hijab, it is a woman’s right to decide what she wants to wear.
This right is GUARANTEED by the Indian constitution. Stop harassing women. #ladkihoonladsaktihoon
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) February 9, 2022
शर्लिन चोप्राने प्रियंका गांधींना विचारला प्रश्न
प्रियंका गांधींचे हे ट्विट शर्लिन चोप्राने रिट्विट केले. यावर शर्लिनने त्यांना प्रश्न विचारला आणि लिहिले की, मिसेस वढेरा, भारतीय संविधानाच्या व्याख्येनुसार, मुलींना शैक्षणिक संस्थांमध्ये बिकिनी घालण्याची परवानगी आहे का? जर असेल, तर कोणत्या प्रकारची? मायक्रो-बिकिनी आणि/किंवा सी-थ्रू. बिकिनी? माझ्याकडे त्या भरपूर आहेत आणि गरज पडल्यास त्या दान करण्यास मला आनंद होईल.
Mrs. Vadra, as per your interpretation of the Indian Constitution, is it permissible for girls to wear bikinis to educational institutions?
If yes, then, what kind?
Micro-bikinis and/or see-through bikinis ?
(P.S. I have tons of them and I’d be happy to donate them if need be.) https://t.co/UniYmsRYPQ— Sherlyn Chopra (शर्लिन चोपड़ा)🇮🇳 (@SherlynChopra) February 9, 2022
हिजाबबाबत मध्य प्रदेशातील वातावरणही चांगलेच तापले आहे. पक्षाचे सरकार आणि विरोधक हिजाबच्या नावाखाली एकमेकांवर आरोप करत असल्याचे दिसत असून प्रियांकाच्या या वक्तव्यावर मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनीही पलटवार केला आहे.
बुरख्याच्या वादावर जावेद अख्तर काय म्हणाले ?
बुरख्याच्या वादावर गीतकार जावेद अख्तर यांनी लिहिले की, मी कधीच हिजाब किंवा बुरख्याच्या बाजूने नव्हतो. मी अजूनही त्यावर ठाम आहे, पण त्याचवेळी मला त्या गुंडांच्या टोळ्यांचा प्रचंड तिरस्कार आहे, जे लोक मुलींना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामध्येही त्यांना यश मिळालेलं नाही. यालाच ते पुरुषत्व मानतात. ही खेदाची गोष्ट आहे.
हे ही वाचलं का ?