नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
केंद्र सरकारकडून आयएएस केडरच्या (IAS cadre) नियमांमध्ये मोठे बदल करण्यात येणार आहेत. अनेक राज्य सरकारांनी या निर्णयाला विरोध केला आहे. यामध्ये बहुतांश बिगर-भाजप शासित राज्ये आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रथम हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर आठवडाभरातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत दोनदा पत्र लिहिले. तसेच महाराष्ट्र, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही आक्षेप घेतला. आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून विरोध केला आहे.
हेही वाचलं का