अफवा पसरवून काँग्रेसवाल्यांनी आपल्याच नेत्याचा पराभव केला, एका गोष्टीने बदलले वातावरण | पुढारी

अफवा पसरवून काँग्रेसवाल्यांनी आपल्याच नेत्याचा पराभव केला, एका गोष्टीने बदलले वातावरण

पुढारी ऑनलाईन: राजकारणात गटबाजी नवीन नाही. भूतकाळातील घटनांवर नजर टाकली तर, गटबाजी आणि राजकारण हे सुरुवातीपासूनच एकमेकांचे साथीदार राहिले असावेत. मात्र, या बाबतीत काँग्रेसचा इतिहास खूपच जुना असल्याचे दिसते. याचे कारण काँग्रेस सर्वात जुना पक्ष असणे हे देखील असू शकते.

गोष्ट आहे 1957 ची. चंद्रभानू गुप्ता हे तत्कालीन मुख्यमंत्री डॉ. संपूर्णानंद यांच्या मंत्रिमंडळात उद्योगमंत्री होते. त्यांनी अनेक योजना सुरू केल्या, पण 1957 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. या पराभवासाठी त्यांनी काँग्रेसमधील गटबाजीला जबाबदार धरले. मात्र, गटबाजीने चंद्रभानू गुप्ता यांचा पिच्छा सोडला नाही. ‘सफर कहीं रुका नहीं, झुका नहीं’ या चरित्रात चंद्रभानू गुप्ता म्हणतात, ‘मला पुन्हा मंत्री केले जाऊ नये म्हणून पं. कमलापती त्रिपाठी यांनी माझ्याविरुद्ध तत्कालीन मुख्यमंत्री डॉ. संपूर्णानंद यांचे कान भरले. त्यामुळे निवडणुकीत पराभूत झालेल्यांना मंत्रिमंडळात घेतले जाणार नाही किंवा त्यांना एक वर्ष पोटनिवडणूक लढवता येणार नाही, असा निर्णय काँग्रेसने घेतला.

आपल्या आत्मचरित्रात लिहताना ते म्हणतात की, वर्षभरानंतर काँग्रेस हायकमांडने मला निवडणूक लढवण्याची परवानगी दिली. पं. गोविंद वल्लभ पंतांना मी राणीखेतमधून निवडणूक लढवावी अशी इच्छा होती, पण तिथून निवडणूक लढवायला मला रस नव्हता. त्यानंतर हमीरपूरच्या मौदाहा येथील आमदार रामगोपाल यांनी त्यांच्या जागेवरून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला. मी तिथून निवडणूक लढवण्यास होकार दिला.

चंद्रभानू यांना ही अपेक्षा नव्हती

सार्वत्रिक निवडणुकीत या जागेवर, प्रजा सोशालिस्ट पार्टीचे नेते आणि बुंदेलखंडमधील अतिशय प्रभावशाली नेते दिवाण शत्रुघ्न सिंग यांचा 1957 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभव झाला. सुरुवातीला त्यांच्या पक्षातील विरोधकांनी शत्रुघ्न सिंग यांना निवडणूक लढवण्यास तयार करण्याचा प्रयत्न केला. ते तयार होत नाही म्हटल्यावर त्यांच्या पत्नीला अपक्ष उमेदवारी देण्याचा सल्ला दिला. सर्व विरोधी पक्ष साथ देतील असा विश्वास त्यांना देण्यात आला.

चरित्रामध्ये सांगितलेल्या गोष्टीनुसार, अखेरीस शत्रुघ्न सिंग यांनी गुप्ताजींच्या विरोधात आपली पत्नी राणी राजेंद्र कुमार यांना उमेदवारी देण्याचे मान्य केले. विरोधकांचा डाव यशस्वी झाला. बुंदेलखंडमध्ये राणी यांचा खूप आदर होता. माझ्यासोबत जे घडले ते मी स्वप्नातही पाहू शकत नाही. मला पराभूत करण्यासाठी पक्षातील अनेक बडे नेते माझ्या विरोधात काम करतील, अशी भीती वाटत होती. पण सरकारी अधिकाऱ्यांनाही माझ्याविरुद्ध कारवाई करण्यास प्रवृत्त केले जाण्याची भीती नव्हती.

अनुसूचित जातीच्या लोकांना धमकावून मतदान करण्यापासून रोखले जाईल. त्याचबरोबर माझ्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या राणी साहिबाच्या संदर्भात माझ्या विरोधात अत्यंत खालच्या पातळीचा आणि विषारी प्रचार केला जाईल याचा अंदाज नव्हता. केशवदेव मालवीय, सरदार योगेंद्र सिंह, मोहनलाल गौतम या काँग्रेसच्या तत्कालीन नेत्यांनी स्वप्नातही अपेक्षित नसलेले काम केले.

लग्नाच्या अफवेने वातावरण बिघडले

मौदहा येथील रहिवासी लोकशाही सेनानी आणि ज्येष्ठ पत्रकार देवीप्रसाद गुप्ता सांगतात की, चंद्रभानू हे जिंकल्यास परिसरात खूप विकास होईल, अशी लोकांना अपेक्षा होती. गुप्तजींनीही खूप मेहनत घेतली. प्रचारासाठी शेकडो सायकलींचे वाटप करण्यात आले. तसेच लाऊडस्पीकर आणि माईक देण्यात आले होते. लोकांनी गुप्ता यांच्या समर्थनार्थ मते मागितली. पण मतदानाच्या एक दिवस आधी काही लोकांनी मौदाहामध्ये अफवा पसरवली की जर गुप्तजी जिंकले तर ती राणीचा डोला (कोणाला तरी उचलून घेऊन जाऊन तिच्याशी जबरदस्तीने लग्न करणे ) उचलून घेऊन जातील. यामुळे लोकांमध्ये नाराजी पसरली.

लोकांनी हा बुंदेलखंडचा अपमान मानला. गुप्ताजी आणि त्यांच्या समर्थकांनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण काहीही होऊ शकले नाही. लोक शांत झाले नाहीत. त्यांनी राणीच्या बाजूने एकतर्फी मतदान केले. गुप्तजींचा निवडणुकीत पराभव झाला. देवीप्रसाद यांच्या म्हणण्यानुसार राणी साहिबा यांनी स्वातंत्र्य चळवळीत इंग्रजांविरुद्ध खूप संघर्ष केला होता. त्या गरिबांच्या प्रत्येक गरजेसाठी धावून यायच्या. त्यामुळे त्यांना लोकांमध्ये खूप आदर होता.

Back to top button