

पुढारी ऑनलाईन डेस्क: लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील निवडणूक मतदान प्रक्रिया (Lok Sabha election) आज (दि.२५) पार पडत आहे. देशातील ७ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेशातील (जम्मू-काश्मीर) ५८ जागांवर मतदान सुरू झाले आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत १०.८२ टक्के मतदान झाले आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
देशातील ७ राज्यांमध्ये निवडणुकीच्या 6व्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत एकूण १०.८२ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये (Lok Sabha election)पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक १६.५४ टक्के तर ओडिसामध्ये सर्वात कमी ७.४३ टक्के मतदान झाले आहे. याशिवाय बिहार-९.६६ टक्के, हरियाणा-८.३१ टक्के, जम्मू-काश्मीर-८.८९ टक्के, झारखंड-११.७४ टक्के, दिल्ली-८.९४ टक्के, उत्तर प्रदेश १२.३३ टक्के मतदान झाले आहे.
हेही वाचा: