मुंबई : कंळबोली एफसीआयच्या गोदामाला भीषण आग; लाखो टन धान्याचा जळून कोळसा

गोदामाला भीषण आग
गोदामाला भीषण आग
Published on
Updated on

नवी मुंबई ; पुढारी वृतसेवा : ऐन दिवाळीत कळंबोली येथील फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामाला आज (बुधवार) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागण्याची घटना घडली. या आगीत एफसीआयचा जी पाच बी या गोदामातील लाखो रुपयांचे अन्नधान्य जळून खाक झाले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची माहिती मिळाली आहे. आग विझविण्यात पनवेल, कंळबोली अग्निशमन दलाला यश आले आहे.

सकाळच्या सुमारास ही आग लागली  

अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आल्याची माहिती पनवेल तहसीलदार विजय तळेकर यांनी दिली. हे गोदाम केंद्र सरकारच्या अखत्यारीत असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अन्न धान्याचा साठा ठेवला जातो.

रायगड, मुंबई, नवी मुंबईसह इतर ठिकाणी याच गोदामातून रेशन दुकानदारांना माल पाठवला जातो. सध्या या गोदामात किती मेट्रीक टन माल होता. ही माहिती केंद्राचे संबंधित विभागाचे डीजी अधिकारी देऊ शकतील. ते अद्याप घटनास्थळी दाखल झाले नसल्याने नुकसानीची आकडेवारी अद्याप कळू शकली नाही. मात्र आगीचे लोंढे पाहता लाखो रुपयांचे धान्य या गोदामात जळून खाक झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा :  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news