यवतमाळ: भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

यवतमाळ: भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

यवतमाळ: पुढारी वृत्तसेवा: मारेगाव येथील दोन भाऊ आपल्या पत्नीसमवेत चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे गेले होते. परत येत असताना घुगूसजवळ त्यांचे चारचाकी वाहन दुभाजकावर जाऊन उभ्या ट्रकवर आदळले. या भीषण अपघातात चौघे जागीच ठार झाले. आज दुपारी (दि.२३) २ वाजता ही दुर्दैवी घटना घडली.

रफीक नबी वस्ताद शेख, पत्नी संजिदा रफीक शेख, युसूफ नबी वस्ताद शेख, पत्नी मुमताज युसूफ शेख (रा. मारेगाव) असे अपघातात ठार झालेल्या चौघांची नावे आहेत. हे कुटुंब गुरुवारी आपल्या नातेवाईकांच्या एका कार्यक्रमाला राजुरा (जि. चंद्रपूर) येथे गेले होते. मारेगावकडे परतीचा प्रवास सुरु असताना घुगूस नजीक हे वाहन दुभाजकावर आदळून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभ्या ट्रकवर जाऊन आदळले.

या अपघातात दोन सख्ख्ये भाऊ व त्यांची पत्नी जागीच ठार झाले. अपघात एवढा भयावह होता की, वाहनाचे प्रत्येक भाग गॅस कटरने कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान, मृत मोठा भाऊ रफीक शेख यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी आहे. तर लहान भाऊ युसूफ शेख याच्या पश्चात दोन मुली आहेत. या दुर्देवी घटनेने मारेगावात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news