वर्धा, पुढारी वृत्तसेवा : वर्ध्यासह विविध भागात रविवारी सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. जोरदार पावसाने जनजीवन प्रभावीत झाले. जवळपास अर्धा तास पावसाने तुफान बॅटींग केली. वर्धा शहरासोबतच विविध भागाला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. सायंकाळी आकाशात ढग दाटून आले. पावसाला सुरूवात होताच रस्त्याने फिरणारे नागरिक पावसापासून संरक्षणासाठी रस्त्याच्या कडेला थांबले.