Chandrashekhar Bawankule | राहुलजी, 2009 मध्ये 5 महिन्यांत 30 लाख मतदार कसे वाढले ?

Chandrashekhar Bawankule | स्वतःचं अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला
chandrashekhar bawankule
Chandrashekhar Bawankule File Photo
Published on
Updated on

Chandrashekhar Bawankule on rahul gandhi

नागपूर : मतदार वाढीवर सतत भाजपला प्रश्न विचारणाऱ्या काँग्रेसनेते,विरोधी पक्षनेते राहुल गांधींना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आकड्यांनिशी चोख प्रत्युत्तर दिले आहे.2009 मध्ये 5 महिन्यांत 30 लाख मतदार कसे वाढले ? असा सवाल केला आहे.

2009 ला निवडणूक आयोगावर विश्वास होता की तेव्हाही काँग्रेस-आयोग युतीच होती?

स्वतःचं अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा असा सबुरीचा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

chandrashekhar bawankule
Maharashtra Politics | विधानसभेची निवडणूक ही 'मॅच फिक्सिंग'च, दम असेल तर...; वडेट्टीवार संतापले!

तेव्हा निवडणूक आयोग-काँग्रेस युती होती का?

बावनकुळे म्हणाले, राहुल गांधी म्हणतात महाराष्ट्रात 5 महिन्यांत 39 लाख मतदारांची वाढ “संशयास्पद” आहे. पण राहुलजी 2009 ला काय झालं होतं? तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो.

एप्रिल 2009 ला लोकसभा निवडणुकीत 7 कोटी 29 लाख 54 हजार मतदार होते तर ऑक्टोबर 2009 ला विधानसभा निवडणुकीत 7 कोटी 59 लाख 68 हजार मतदार झाले. तेव्हाही फक्त 5 महिन्यांत 30 लाख मतदार वाढले होते!

तेव्हा तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास होता की तेव्हाही काँग्रेस-आयोग युतीच होती? तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का? याचे उत्तर द्या.

तुम्ही जिंकता तेव्हा तुम्हाला प्रश्न पडत नाहीत...

ते म्हणाले, 2004, 2009 ला तुम्ही जिंकलात तेव्हा काही प्रश्न पडले नाहीत! आज पराभव झाला, महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला झिडकारलं तेव्हा रडगाणं सुरू झालं.

राहुलजी आकड्यांचं अर्धवट वाचन करून देशाला गोंधळात टाकण्याचा निरर्थक प्रयत्न करू नका. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा.

महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला नाकारलं आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार आहे. त्याच भीतीतून तुम्ही आतापासून पराभवाचे कारण देत आहात.

chandrashekhar bawankule
Nagpur Hit and Run | अजनीत ‘हिट अँड रन’, दोन तरुणांचा मृत्यू

जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही

ते म्हणाले, आमच्या महायुतीला महाराष्ट्रातील जनतेने बहुमताने निवडून दिले. जनतेने आमच्यावर दाखविलेला हा विश्वास आहे. तो पुढील निवडणुकीतही असाच कायम राहील.

आपण वारंवार खोटे बोलून राज्यातील जनदेशाचा अपमान करीत आहात. जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही असा इशाराही दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news