Maharashtra Politics | विधानसभेची निवडणूक ही 'मॅच फिक्सिंग'च, दम असेल तर...; वडेट्टीवार संतापले!

विधानसभा निवडणुकीत नेमके काय झाले होते?
Maharashtra Politics
विजय वडेट्टीवार आणि चंद्रशेखर बावनकुळे. (Pudhari Photo)
Published on
Updated on

Maharashtra Politics News

नागपूर : महाराष्ट्रात झालेली विधानसभा निवडणूक ही मॅच फिक्सिंगच होती, या निवडणुकीत नेमके काय झाले? हे सत्य लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मांडले. दम असेल तर यावर खुलासा करावा असा दावा काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांना आव्हान देत 2009 च्या निवडणुकीतील आकडेवारी दिली. यावर वडेट्टीवार यांनी पलटवार केला.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्रात निवडणुकीत झालेले मतदान, २०२४ लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत मतदारांची वाढलेली संख्या आणि महाराष्ट्रात मतदानाची वेळ संपल्यावर अचानक वाढलेली मतदानाची टक्केवारी याबाबत लेखातून भूमिका मांडली आहे.

Maharashtra Politics
Maharashtra Political News | महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल : उद्धव

मुळात केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त निवडण्याची प्रक्रियाच सदोष आहे. त्यानंतर विविध यंत्रणांना हाताशी धरून सत्ताधाऱ्यांनी निवडणूक जिंकली, असा आरोप विधिमंडळ नेते वडेट्टीवर यांनी केला. मतदानाची वेळ संपल्यावर २०२४ विधानसभा निवडणुकीत साडेआठ टक्के सरासरीने मतदानाची टक्केवारी वाढते हे संशयास्पद आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बेईमान पद्धतीने सरकार आलेले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वस्तुनिष्ठ माहिती दिली आहे, यावर संबंधितांनी खुलासा केला पाहिजे.

Maharashtra Politics
Minority Commission Chairman | प्यारे खान संतापले, राणेंनी संस्कार शिकवू नयेत!

राज्यात सारथी, बार्टी, महाज्योती यांना समान निधी वाटप केल्याचा दावा सरकार करत असले तरी सारथीला इमारत आणि हॉस्टेल बांधण्यासाठी अधिकचा निधी दिला आहे. इतर संस्थांना कमी निधी दिला आहे. महाराष्ट्राची तिजोरी ही ओबीसी समाजासाठी नाही का? निवडणुकीत भाजप ओबीसी समाजाची मत घेते आणि सरकार आल्यावर मात्र दुर्लक्ष करतात? हा अन्याय आहे. सरकारने सर्वांना समान निधी आणि न्याय द्यावा, अशी मागणी वडेट्टीवर यांनी केली.

'ठाकरे बंधू एकत्र आल्यास स्वागतच'

राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहे. राज्यातील महाराष्ट्र विरोधी सरकार घालवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर त्याचे आम्ही स्वागत करतो, असे वडेट्टीवार म्हणाले. ठाकरे बंधू एकत्र येण्याची भीती सत्ताधाऱ्यांना का वाटते? त्यांच्या युतीच्या बातम्यांनी सत्ताधारी का अस्वस्थ होत आहेत, असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news