Nagpur Rains : नागपूरला मुसळधार पावसाने झोडपले, जनजीवन विस्कळीत; शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

शहरात तब्बल १३६.९ मिलिमीटर पावसाची नोंद
Nagpur Rains
नागपूर शहरातील सखल भाग जलमय झाला आहे.ANI Photo
Published on
Updated on

Nagpur Rains : रविवारच्या रात्रीपासून उपराजधानीत सुरू झालेल्या पावसाने आज (दि. ९) तिसऱ्या दिवशीही जाेर कायम ठेवला आहे. गेल्या २७ तासांत नागपूर शहरात तब्बल १३६.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, नागपूरकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या 'येलो अलर्ट'च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे. Nagpur Rains

शहरातील सखल भागांत पूरसदृश परिस्थिती

मागील तीन दिवसांपासून अविरतपणे कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. विशेषतः नंदनवन आणि हसनबाग यांसारख्या परिसरातील परिस्थिती गंभीर बनली आहे. येथील अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले असून, शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. घरात पाणी साचल्याने नागरिकांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा पाणी उपसा करण्यासाठी आणि नागरिकांना मदत करण्यासाठी कार्यरत आहे, मात्र पावसाचा जोर कायम असल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत.

Nagpur Rains
Nanded News : सेनेचे आंदोलन यशस्वी, नांदेड - नागपूर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प

ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम

केवळ नागपूर शहरच नव्हे, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, भिवापूर तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक ११८.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यासोबतच रामटेक, मौदा, कुही आणि पारशिवनी या तालुक्यांमध्येही १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस कोसळला आहे. या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, अनेक गावांचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतीपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Nagpur Rains
Samruddhi Highway : नागपूर-मुंबई आता १६ तासाऐवजी ८ तासात

प्रशासनाकडून शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश

हवामान विभागाने आज नागपूर जिल्ह्यासाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. बिपिन इटनकर यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये आज, मंगळवारसाठी बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यकता नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी बचाव पथके आणि संबंधित यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news