मंत्री गोविंद शेंडे यांनी म्हटलं आहे की, आजपर्यंत राज्यात तसेच देशातल्या विभिन्न भागात अतिरेक्यांच्या हल्ल्याचा कधीही या समाजाने साधा निषेध सुद्धा केला नाही, पीफआय सारख्या देशविघातक संघटनांचाही विरोध या समाजाने कधी केला नाही. पाकिस्तानला दहशतवादी गतीविधीकरीता कधी ठणकावले का? अशी कोणती मजबुरी झाली की एवढ्या तातडीने शासनाने वक्फ बोर्डाला हा निधी मंजूर केला, असा प्रश्नही शेंडे यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. एवढेच करून सरकार थांबले नसून 10 कोटी पैकी 2 कोटी रुपयांचा निधी त्वरित उपलब्ध करूनदिला असल्याने महाराष्ट्रात वक्फ बोर्डवर बंदी आणण्याऐवजी केवळ लांगुलचालन करण्याचे हे कृत्य असल्याचे शेंडे यांनी तोफ डागली.