विधानसभा निवडणुकीत भाजपपेक्षा काँग्रेसला ११ लाख मते अधिक : नाना पटोले
नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपपेक्षा काँग्रेसला ११ लाख मते जास्त मिळाली आहेत. परंतु आम्ही जनमत स्वीकारले आहे. लोकांच्या मनात भाजपविषयी मोठा रोष आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना केला. Nana Patole
इंडिया आघाडीबाबत काल ज्या बातम्या पेरल्या, त्या पूर्णपणे खोट्या आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज नाहीत. लोकसभेच्या तयारीसाठी इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. Nana Patole
ज्या घोषणा भाजपने केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी होते की, जुमलेबाजी होणार? हे पाहावे लागणार आहे. भाजप तीन राज्यात जिंकल्याने आता राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काय हाल होतील? हे फेब्रुवारीत पाहायला मिळेल. आज पण त्यांचे हाल होतच आहेत, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.
हेही वाचा