चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला सरसकट ओबीसींमध्ये समाविष्ट करु नये यासह विविध मागण्यांकरीता चंद्रपुरात ओबिसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष रवींद्र टोंगे उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, सरकारने त्यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याने ओबिसींकडून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. आंदोलकांनी गुरुवारी (दि.२१) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे मुखवटे लावून सामुहिक मुंडन केले.