![चंद्रपूर: गोसेखुर्द कालव्यात पडून शाळकरी मुलीचा मृत्यू](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F08%2Fdrowing.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : एका अकरा वर्षीय शाळकरी मुलीचा गोसेखुर्दच्या कालव्यात पडून मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना आज (दि. 20 )सकाळी अकराच्या सुमारास ब्रम्हपूरी तालुक्याती रानबोथली जवळील कालव्यात घडली. अमृता संदीप मरस्कोल्हे ( रा. रानबोथली ) असे मृत मुलीचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुkht, ब्रम्हपुरी तालुक्यातील रानबोथली येथील अमृता आपल्या आजीसोबत शेतावर गेली होती. अमृता पाणी घेण्यासाठी नहरात उतरली होती. तेवढ्यात तिचा पाय घसरल्याने ती पाण्यात पडली; परंतु पाण्याची पातळी जास्त असल्याचे व पाण्याला धार कालव्यातून ती वाहत गेली. आजीने आरडाओरड केली. घटनेची माहिती मिळताचा नागरिकांनी घटनस्थळी धाव घेतली. काही नागरिकांनी काव्यात नहरात उडी घेऊन अमृताचा शोध घेतला. घटनास्थळापासुन सुमारे १ किमी अंतरावर अमृताचे मृतदेह सापडला. अमृताच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :