भंडारा: पुढारी वृत्तसेवा : माजघरात देवापुढे लावलेली दिव्याची पेटती वात उंदराने घेऊन गेल्याने घराला लागलेल्या आगीत साहित्य जळून खाक झाले. ही घटना आज (दि. ६) सकाळी ८ च्या सुमारास लाखांदूर येथील वार्ड क्रमांक ३ मध्ये घडली.
या घटनेत बुधेश्वर रघुनाथ रासेकर (वय ७०) यांचे घर आणि घरातील साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घराला आग लागून घरातील साहित्य जळून खाक झाल्याची माहिती लाखांदूर महसूल विभागाला होताच लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांच्या मार्गदर्शनात तलाठी आशिष खामणकर व सहकारी खुशाल दिघोरे यांनी घटनास्थळी पोहोचत घटनेचा पंचनामा केला. या घटनेत जवळपास २५ हजार रुपये किंमतीचे साहित्य जळून खाक झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा