अकोला : राष्ट्रीय महामार्गावरील वाशिंबा जवळ अपघात; दोन दुचाकीस्वार ठार
अकोला; पुढारी वृत्तसेवा : बोरगाव मंजू पोलिस स्टेशन अंतर्गत राष्ट्रीय महामार्गावर वाशिंबा नजीक कारच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार झाले आहेत. ही घटना रविवारी (दि. १७ मार्च ) रोजी सकाळी घडली. या अपघातात मृत्यू झालेल्याची पवन पिराजी गायकवाड ( वय २६) आणि वैभव विजय गवळी (वय २४) अशी नावे आहेत.
संबंधित बातम्या
- Tamilisai Soundararajan resigns | ब्रेकिंग! तमिलिसाई सुंदरराजन यांचा राज्यपालपदाचा राजीनामा
- साडवली बैलगाडा स्पर्धा : खेर्डे कातळवाडीच्या सचिन म्हादे यांची बैलजोडी प्रथम
- Prakash Raj : ४२० करणारे ४०० पारबद्दल बोलताहेत, अभिनेते प्रकाश राज यांचे भाजपवर टीकास्त्र
मिळालेल्या माहितीनुसार, शिवणी येथील पवन पिराजी गायकवाड, वैभव विजय गवळी हे दोघे दुचाकी ( क्रमांक एमएच. ३० बीआर ३०३३ ) ने शिवणी येथून अमरावती येथे स्पर्धा परीक्षा देण्यासाठी जात होते. दरम्यान, अकोलाहून पाठीमागून अमरावतीकडे जाणारी कार (क्रमांक एमएच. १९ इए २२९७ ) या कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व कारने समोरच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार पवन गायकवाड व वैभव गवळी दोघेही गंभीर जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवून या दोन जखमींना अकोला येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. दरम्यान, पोलिसांनी कारसह चालकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस करीत आहेत.