राज्यात गुंडाचा मुक्त संचार : विजय वडेट्टीवारांचा घणाघात | पुढारी

राज्यात गुंडाचा मुक्त संचार : विजय वडेट्टीवारांचा घणाघात

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. तीन पक्षांच्या घोटाळेबाज सरकारचा हा परिपाक आहे. कधी नव्हे तो राज्यात गुंडाचा मुक्त संचार होत आहे. ज्या गुंडांनी गोळ्या झाडल्या तो पूर्ण प्लॅन होता. त्यानंतर स्वतःवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न हे मोठे षड्यंत्र आहे. घोसाळकर यांचा खून प्लॅन करुन करण्यात आला आहे. हे भांडण राजकीय वर्चस्वासाठी असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

वडेट्टीवार म्हणाले, यापूर्वी सत्ताधारी आमदार पोलीस स्टेशन मध्ये गोळी झाडतो. ज्या घटना सत्ताधाऱ्यांकडून होत आहेत, पोलीस हमारे साथ आहेत अशी मस्ती आली आहे. दुसरीकडे राज्य वाऱ्यावर सोडून सत्ता व संपत्ती टिकवण्यासाठी सत्तेचा वापर केला जात आहे, जनतेचे काहीही घेण देणं नाही. गृहमंत्री हतबल झालेले दिसत आहेत.

राणे यांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, काही लोकांच्या तोंडाला झाकण नसते. काही लोक केवळ सत्तेत राहण्यासाठी धडपडत आहेत. भाजप नेते बावनकुळे यांच्या आंदोलनासंदर्भात बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी जे बोलले ते सत्य आहे. त्यावेळी त्या समाजाला ओबीसीमध्ये का घेतले नाही? ओबीसींचा सत्यानाश करायचा जीआर निघाला, त्यावेळी बावनकुळे का बोलले नाही? खरेतर बैठक न घेता मराठा समाजासाठी जीआर काढला, यावर तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button