नागपूर: पुढारी वृत्तसेवा: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नुकतीच पुण्यात एका उद्योगपतीच्या घरी भेट झाली. या संदर्भात शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे बाकीचे लोक काय म्हणतात? याला काही फार महत्त्व नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सहकार मंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी स्पष्ट केले. आज (दि. १४) नागपुरात विमानतळावर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Dilip Valse-Patil)
माजी मंत्री नवाब मलिकांना न्यायालयीन प्रक्रियेतून जामीन मिळाला आहे. त्यांना विश्रांती घेऊ दिली पाहिजे. ते शांतपणे आपला निर्णय घेतील. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी संभ्रम संपला पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. याबाबतीत बोलताना पवारांची भूमिका सुरुवातीपासूनच स्पष्ट आहे, संभ्रम होण्यात काही कारण नाही, असा पुनरुच्चार दिलीप वळसे -पाटील यांनी केला. (Dilip Valse-Patil)
दरम्यान, मनसेला भाजपची युतीसाठी ऑफर असल्याच्या चर्चांकडे वळसे-पाटील यांचे लक्ष वेधले असता याचा निर्णय मनसे अध्य़क्ष राज ठाकरे घेतील. बाकीच्या लोकांची यात अडचण असण्याचे काही कारण नाही, असे वळसे-पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा