स्वातंत्र्याची स्मृती तेवत राहावी, जनतेच्या मनातील स्वातंत्र्याच्या स्मृती तेवत राहाव्यात,स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतीकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरुपी जनमाणसात राहावी,दैदीप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्याच्या उद्देशाने 'हर घर झेंडा' हा उपक्रम 15 ऑगस्टपर्यंत राबविण्यात येत आहे. या दरम्यान ध्वजसंहितेचे पालन करा, कागदी व प्लास्टिक झेंडे वापरू नका असे आवाहन प्रशासनाने केले आहे.