उद्धव ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते शिंदे गटात आणि काही भाजपमध्ये येत आहेत. २०२४ पर्यंत उद्धव ठाकरे यांच्याकडे काहीच लोक शिल्लक राहतील. येत्या काळात भाजपामध्ये मोठ्या संख्येने पक्षप्रवेश होणार आहे. पुढच्या काळात उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीकडेही विधानसभा लढवायला उमेदवार राहणार नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली.