![दहा रुपयांच्या रिचार्जमध्ये तहहयात चालू राहील फोन! : ‘युनिनॉर’ची आंध्र प्रदेशमध्ये सुविधा](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F08%2F%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
अमरावती : वृत्तसंस्था दहा रुपयांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला 'लाईफटाईम टॉकटाईम' मिळेल. सध्या आंध्र प्रदेशातील लोकांना ही सुविधा उपलब्ध झालेली आहे. जिओ आणि एअरटेल या कंपन्या प्लॅनच्या बाबतीत नेहमी आघाडीवर राहिलेल्या आहेत; पण 'युनिनॉर'नेही आता या दिशेने आघाडी घेतली आहे.
20 रुपयांचा रिचार्ज केला तर 20 रुपयांचा, 30 च्या रिचार्जवर 30 चा, 50 वर 50 चा टॉकटाईम, असे हे प्लॅन आहेत. कुठल्याही प्लॅनला 'व्हॅलिडिटी' (चालू राहण्याची मुदत) नाही. एकदा रिचार्ज केल्यानंतर वापर होत नाही, तोवर हे प्लॅन तुमच्या मोबाईल फोनमध्ये तसेच कायम राहणार, असा याचा अर्थ आहे. आंध्र प्रदेशातील 23 जिल्ह्यांतील 500 शहरे आणि 2 हजारांहून अधिक गावांतून कंपनीने नेटवर्क स्थापन केले आहे.
हेही वाचा :