नागपूर : वाघ मृत्यू प्रकरणात तीन आरोपींना अटक | पुढारी

नागपूर : वाघ मृत्यू प्रकरणात तीन आरोपींना अटक

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : १३ मार्च रोजी उत्तर उमरेड वनपरिक्षेत्रात झालेल्या वाघ मृत्यू प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. १५ मार्च रोजी आलेल्या शवविच्छेदन अहवालात वाघाचा मृत्यू वीजेच्या धक्क्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर मध्य प्रदेशातील रामपूर (भाटा) येथून भैयालाल जंगलु दरशिम्हा, मनकलाल प्रेमनाथ दरशिम्हा, दिलीप सुक्कन शिनू यांना ताब्यात घेण्यात आले. उद्या २१ मार्च रोजी त्यांना वनकोठडीसाठी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी उमरेड यांच्या न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.

शवविच्छेदनानंतर तपास करण्यात आला असता घटनास्थळावरून तार व खुंट्या जप्त करण्यात आल्या. खबऱ्यांद्वारे माहिती घेतली असता विटाभट्टी परिसरात रान डुकराची शिकार करून मांस खाल्याचे समजले. त्यावरून विटाभट्टी मुनीम नवनीत विश्वनाथ शामकुंवर यांच्याकडे चौकशी केली असता वीज प्रवाहाने शिकार करून मांस खाणारे वीटभट्टी मजूर असल्याचे सांगितले. त्यावरून माग काढीत तीघांना अटक केली.

हेही वाचलतं का?

Back to top button