Ramdas Athawale | उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीने एकत्र यावे : रामदास आठवले

Ulhasnagar RPI(A) रिपाई लढणार महापालिकेत 15 जागा
Ulhasnagar Municipal Election
Ramdas Athawale Pudhari
Published on
Updated on

Ulhasnagar Municipal Election

उल्हासनगर : आगामी उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाई या पक्षांच्या महायुतीने एकत्र येऊन लढवावी, अशी महत्त्वपूर्ण विनंती केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार उभे केले होते, परंतु उल्हासनगरमध्ये मात्र महायुती व्हावी, असा आग्रह आठवले यांनी धरला आहे.

रविवारी रात्री उल्हासनगर येथील गोल मैदान या ठिकाणी रिपाईचे शहर अध्यक्ष नाना बागुल यांनी पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी रामदास आठवले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही सूचना केली ते पुढे म्हणाले की रिपाई पक्षाला आगामी महानगरपालिका निवडणुकीत किमान 15 जागा मिळाव्यात अशी मागणी केली. तसेच, महायुती एकत्रितपणे निवडणूक लढल्यास उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये निश्चितपणे महायुतीचा महापौर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Ulhasnagar Municipal Election
Ulhasnagar Crime | कारला कट मारल्याच्या वादातून सराईत गुंड जॅकी आलमचंदानीवर चाकू हल्ला

आठवले यांनी उल्हासनगर शहराच्या सामाजिक भूमिकेवर प्रकाश टाकला. उल्हासनगर हे एकेकाळी दलित चळवळीचे मोठे केंद्र होते आणि येथे ठिकठिकाणी छावण्या उभारण्यात आल्या होत्या, अशी आठवण त्यांनी करून दिली. तथापि, आता रिपाई पक्ष सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन चालतो. या शहरात सिंधी, मुस्लिम, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय तसेच विविध समाजाचे लोक राहतात, असे ते म्हणाले. या संदर्भात बोलताना त्यांनी रिपाई पक्षाने विधानसभा निवडणुकीत सिंधी समाजाचे पप्पू कलानी यांना तिकीट देऊन त्यांना आमदार म्हणून निवडून आणले होते, या वस्तुस्थितीवर बोट ठेवले.

राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य करतानाच आठवले यांनी कोकणच्या जगप्रसिद्ध हापूस आंब्याच्या दर्जाचा मुद्दाही उपस्थित केला. सध्या बलसाडमध्ये पिकलेल्या आंब्यालाही हापूस आंब्याचे नाव देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यावर त्यांनी कोकणचा हापूस आंबा हा नंबर एकचा असेल आणि त्याला मिळालेला एक नंबरचा दर्जा कलंकित होता कामा नये, असे स्पष्ट मत व्यक्त केले.

Ulhasnagar Municipal Election
Ulhasnagar Crime | चोरीच्या दुचाकीवरून सोनसाखळी खेचणाऱ्या चोरट्याला अटक; उल्हासनगर गुन्हे शाखेची कारवाई

रामदास आठवले यांनी काँग्रेस पक्षाकडून वारंवार केल्या जाणाऱ्या 'संविधान धोक्यात आहे' या प्रचारावरही टीका केली. "हा काँग्रेसचा अपप्रचार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान आजही मजबूत आणि सुरक्षित आहे," असे ठामपणे आठवले म्हणाले. काही ठिकाणी दलित समाजावर अत्याचाराच्या घटना घडत असल्याच्या घटना मान्य करत, अशा अत्याचारांविरुद्ध आपला पक्ष नेहमी लढा देत असतो, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

यावेळी रिपाई नेते नाना बागुल, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार कुमार आयलानी, शिवसेना महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, महेश गायकवाड, अरुण आशान, भाजप शहराध्यक्ष राजेश वधारिया, रिपाई नेते शांताराम निकम, नाना पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news