Thane Nature Tourism | ठाणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बहरली, निसर्ग पर्यटनाला पर्यटकांची मोठी पसंती

ठाणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बहरली, निसर्ग पर्यटनाला पर्यटकांची मोठी पसंती
Thane Nature Tourism
Thane Nature Tourism
Published on
Updated on

ठाणे : निसर्गान समृद्ध असलेला जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. वैतरणा आणि उल्हास या दोन महत्वाच्या नद्या, तानसा अभयारण्य, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, गडकिल्ले, पर्वतरांगा, माळशेज घाट, तुंगारेश्वर धबधबा ही सर्व पर्यटनस्थळे सुरुवाती पासूनच पर्यटकांना आकर्षित करत आली आहेत. ठाणे जिल्हा हा मुंबईला लागून असल्याने विशेष करून मुंबई-वरून येणाऱ्या पर्यटकांचे ही सर्व ठिकाणे नेहमीच आकर्षणाचा विषय ठरली आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रातील तलावांचे शहर म्हणूनही ठाणे शहराची ओळख आहे, ठाण्यात एकूण ३० तलाव आहेत. तर ठाणे शहराचा परिसरही येऊर व पारसिक डोंगरांनी वेढलेला आहे. त्यामुळे ठाणे शहरात राहणाऱ्या निसर्गप्रेमींना हाकेच्या अंतरावरच पर्यटनाचा आनंद लुटता येतो हे विशेष.

Thane Nature Tourism
August Solar Lunar Eclipses-ऑगस्टमध्ये दोन ग्रहणे ! भारतातून दिसणार नाहीत

मुंबई आणि ठाणेकरांना जवळच्या ठिकाणी पर्यटनासाठी कुठे जायचा असा प्रश्न पडला, तर रोमांचक सहलीसाठी आणि पर्यटनासाठी ठाणे जिल्हा नेहमीच सज्ज आहे. पर्यटन स्थळांच्या सोबतच ऐतिहासिक स्मारके, धार्मिक स्थळांचा अभ्यास याच जिल्ह्यात करायला मिळतो हे ठाणे जिल्ह्याचे आणखी एक खास वैशिट्य आहे.

तानसा धरण आणि अभयारण्य...

मुंबईतील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याच्या सात स्त्रोतांपैकी एक म्हणून प्रसिद्ध असलेले हे धरण त्याच्या नयनरम्य वातावरण आणि शांततेमुळे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. शांततेदरम्यान संध्याकाळ घालवण्यासाठी व दिवसा सहलीसाठी लोक येथे मोठ्या संख्येने येतात. मुळात हे धरण १९२५ मध्ये बांधले होते; परंतु वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी धरणाची उंची सतत वाढवली जात आहे. आपण आपल्या मित्रांसह आणि कुटुंबासह या ठिकाणी पर्यटनस्थळाचा आनंद घेऊ शकता.

तानसा धरणाच्या जवळच तानसा तलाव आहे जे आत्यंतिक सौंदर्याचे प्रतीक आहे व संपूर्ण नैसर्गिक सौंदर्याचा अभिमान बाळगते. वैविध्यपूर्ण वनस्पती आणि प्राणिमात्रांनी भरपूर, धरणात समृद्ध वन्यजीव व जैवविविधता आहे. तेथे अनेक पर्यटन उपक्रम आहेत जे आपण सरोवरात करून पाहू शकता, ज्यात नाईट कॅम्पिंग, बोटिंग आणि बर्ड स्पॉटिंग यांचा समावेश आहे.

Thane Nature Tourism
Western Ghats Sensitive Villages-पश्चिम घाट संवेदनशील गावांची संख्या ३८२ ने वाढली

तानसा वन्यजीव अभयारण्य हे ठाणे जिल्ह्यात स्थित वन्यजीव अभयारण्य आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध वन्यजीव अभयार-ण्यांपैकी एक आहे. वनस्पती व प्राणी दोन्ही दुर्मिळ प्रजातीं या अभयारण्यात पाहायला मिळतात. ठाणे जिल्ह्यात येणाऱ्या शहापूर, वाडा, मोखाडा आणि तालुक्यांमध्ये वन्यजीव अभयारण्य ३२० चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. ज्यांना वन्यजीव आणि संवर्धनाची आवड आहे. त्यांच्यासाठी हे अभयारण्य अभ्यासाचे चांगले ठिकाण आहे. तानसा अभयारण्यात पायवाटांचा शोध घेण्यासाठी १-२ तास पर्यटक वेळ घालवतात, अनेकदा पक्षी, प्राणी व वनस्पतींच्या विविध या ठिकाणी पाहायला मिळतात. हा परिसर वैतरणा, खर्डी आणि शहापूरची जंगले व्यापतो आणि तानसा तलाव या प्रदेशात बरीच जमीन व्यापतो, यामुळे या अभयारण्यात वन्यजीवांसाठी पाण्याचा चांगला स्त्रोत बनला आहे.

केळवा बीच

अरबी समुद्राच्या बाजूने ७किमीच्या किनारपट्टीवर पसरलेला, केळवा बीच महाराष्ट्रातील टॉप वीकएंड गेटवेपैकी एक आहे. सुंदर सुरूच्या झाडांच्या रांगा, समुद्रकिनारी स्वप्नातील सोनेरी वाळू सूर्यस्नान, निवांत किंवा दूरवर फेरफटका मारण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. समुद्रकिनाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे मंत्रमुग्ध करणारे सूर्यास्त जे निळ्या आकाशाला नारिंगी आणि जांभळ्या रंगांनी भरलेले असताना नेत्रदीपक दृश्याचे साक्षीदार होण्यासाठी अनेक पर्यटकांना आमंत्रित करतात. विश्रांतीचा सुखद अनुभव घेण्यासाठीही ठिकाण महत्वाचे आहे. या ठिकाणी चालणारी एटीव्ही सवारी, उंटाची सवारी, घोडे सवारी हे पर्यटकांचा आकर्षणाचा विषय ठरली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news