Thane News : यंदा पाणीटंचाई टळणार, मात्र रब्बीचा हंगाम हुकणार

मुरबाड तालुक्याला पाणी नाही तर, अन्न टंचाई भेडसावणार
Early monsoon impact on crops
यंदा पाणीटंचाई टळणार, मात्र रब्बीचा हंगाम हुकणारpudhari photo
Published on
Updated on

मुरबाड : जुन महीन्यात सुरु होणारा पावसाळा यावर्षी मे महिन्यापासून सुरु झालेला आहे. चार महीन्यांचा पावसाळा सहा महिन्याहून अधिक काळ उलटून देखील आजही कायम असल्याने उन्हाळ्याच्या अंतिम काळात सुरु होणारी, वाड्या पाड्यावरील पाणी टंचाई यावर्षी दूर होणार आहे. परंतू या पावसाने खरीप हंगामातील पिके पुर्णतः उध्वस्त केल्याने तालुक्यातील नागरिकांना पाणी टंचाईचा नाही तर अन्न टंचाईचा सामना करावा लागणार आहे. या परिस्थितीमुळे भुकबळीं देखील जाण्याची शक्यता आहे.

ठाणे जिल्ह्यात मौसमी पावसाने परीसीमा गाठल्याने संपूर्ण ऋतूचक्र बिघडवून टाकले आहे. चार महिन्याचा पावसाळा सहा महिन्याचा काळ उलटून गेला तरी सुरुचं असल्याने हिवाळा आणि उन्हाळ्याचा ताळमेळ पुरता बिघडून गेला आहे. तालुक्यात ठराविक गावात रब्बी पिकं घेतली जातात, मात्र खरीप हंगामातील भात पिकांची काढणी अवकाळीने हुकवल्याने कापणीची वेळ कधीचीच निघून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या पदरात काही पडणार नसल्याने या वर्षात तालुक्यात पाणी टंचाई जाणवणार नसली तरी अन्न टंचाई मात्र भेडसावणार आहे.

Early monsoon impact on crops
Lake pollution fish deaths : रसायनमिश्रित पाण्यामुळे तलावातील मासे मृत्युमुखी

या अवकाळी पावसाने शेतीत पाण्याचे पाट वाहत असल्याने, जमीन कोरडी होण्यास जानेवारी फेब्रुवारी उजाडला असल्याने रब्बी हंगामात होणारी वाल, हरभरा, काकडी, भेंडीची लागवड देखील हुकणार आहे. त्यामुळे खरीप पिक कुजली आणि रब्बी लागवड हुकली जाणार असल्याने तालुक्यावर दुष्काळाचे शंभर टक्के सावट आलेले आहे.

Early monsoon impact on crops
Wada farmers protest : वाड्यातील आंदोलनाबाबत शासन असंवेदनशील?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news