अंबरनाथ बदलापूर दरम्यान मालगाडीचे इंजिन फेल; वाहतूक विस्कळीत
बदलापूर : पुढारी वृत्तसेवा बदलापूर मुंबई सीएसटीकडे जाणाऱ्या मालगाडीचे इंजिन बदलापूर आणि अंबरनाथच्या दरम्यान फेल झाले. यामुळे मध्य रेल्वेची अप दिशेची वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बदलापूर अंबरनाथच्या दिशेने जाणारी मालगाडी बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकांच्या दरम्यान आल्यानंतर या मालगाडीचे इंजिन फेल झालं. त्यामुळे या गाडीच्या पाठोपाठ बदलापूर 8 वाजून 25 मिनिटांनी सुटणारी गाडी बदलापूर आणि अंबरनाथ स्थानकांच्या दरम्यान खोळंबली आहे. त्यामागून पुण्या वरून येणाऱ्या अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या या बदलापूर ते कर्जत या स्थानकांच्या दरम्यान थांबवण्यात आल्या आहेत. तर बदलापूर पासून पुढे सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्या बदलापूर तालुक्यात खोळंबून आहेत.
सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असल्यामुळे चाकरमान्यांची प्रचंड गर्दी बदलापूर ते कर्जत दरम्यानच्या स्थानकांवर झाली आहे. कल्याण वरून विशेष इंजिन आल्यानंतर ही मालगाडी पुढे नेण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पहिल्याच पावसानंतर बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांना मध्य रेल्वेच्या भोंगळ कारभाराचा फटका सहन करावा लागला. यामुळे रेल्वेच्या कारभाराविरोधात प्रवाशांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Maharashtra | A goods train stalled between Badlapur-Ambernath section at around 8.40 am because of which UP Suburban local trains & UP mail express traffic are affected between UP Karjat-Badlapur section. Assisting engine has been sent to Badlapur to clear stalled goods train:…
— ANI (@ANI) June 26, 2023
हेही वाचा :