मिरज : पुढारी वृत्तसेवा रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बोलेरो आणि ट्रॅक्टर मध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती गंभीर आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यामधील सातजण बोलेरो मधून सोलापूरच्या दिशेने निघाले होते. वरील सर्वजण मिरज जवळ आले असता राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टर आणि बोलेरो या दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, बोलेरो थेट ट्रॅक्टर मध्ये घुसली.
मृतांमध्ये पुढील लोकांचा समावेश आहे. यामध्ये सोहम पवार (वय १२), कोमल शिंदे (वय ६०), लखन शिंदे (वय ६०), जयवंत पवार (वय ४५) हे सर्व रा.सरवडे यांचा समावेश आहे. तर चालक (३५) च्या विषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचा मिरज पासून सुरु होणार टप्पा काल (मंगळवार) वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग खुला झाल्यानंतर आज (गुरूवार) दुसऱ्या दिवशीच हा अपघात झाला आहे.
हेही वाचा :