सांगली : सदावर्ते सांगतील तेव्हाच कामावर जाणार, एसटी कर्मचाऱ्यांचा निर्णय | पुढारी

सांगली : सदावर्ते सांगतील तेव्हाच कामावर जाणार, एसटी कर्मचाऱ्यांचा निर्णय

सांगली : पुढारी वृत्तसेवा
विलिनीकरणासाठी मुंबईत गेलेले जिल्ह्यातील एस.टी. कर्मचारी सोमवारी पुन्हा सांगलीत परतले. चौघे मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून त्यांना अद्याप जामीन मंजूर झालेला नसल्याचे सांगण्यात आले.

एस. टी. चे महामंडळातून शासनात विलिनीकरण करण्याबाबत उच्च न्यायालत सुनावणी घेण्यात येणार होती. त्यासाठी जिल्ह्यातील सुमारे दोनशे ते सव्वा दोनशे कर्मचारी देखील मुंबईत गेले होते. त्यावेळी आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. या आंदोलनावेळी राज्यातील 109 कर्मचार्‍यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर जिल्ह्यातील जिल्ह्यातील सर्व कर्मचारी आता सांगलीत परतले आहेत.

दरम्यान, अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते हे कोठडीतून बाहेर येवून न्यायालयाचा निकाल जोपर्यंत वाचून दाखवत नाहीत आणि ते जोपर्यंत कामावर जाण्यास सांगत नाहीत, तोपर्यंत कामावर हजर न होण्याचा निर्णय जिल्ह्यातील कर्मचार्‍यांनी घेतला आहे.

Back to top button