सांगली पूर – ३६ हजाराहून अधिक लोकांचे स्थलांतर : डॉ. अभिजीत चौधरी | पुढारी

सांगली पूर - ३६ हजाराहून अधिक लोकांचे स्थलांतर : डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, पुढारी वृत्तसेवा :

सांगली पूर परिस्थिती अतिवृष्टीमुळे बिकट होत चालली आहे. त्यामुळे पुरपट्यातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत ७ हजार ६७१ कुटुंबातील ३६ हजार ९८७ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. याचबरोबर लहान व मोठी अशा एकूण १४ हजार ८०० जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले आहे.

सांगली पूर स्थिती :

जिल्ह्यात पूरस्थितीमुळे ६ गावे पूर्णत: बाधित आहेत. तर ८० गावे अंशत: बाधित आहेत.

यामध्ये मिरज तालुक्यात महानगरपालिका क्षेत्रातील 1 गाव अंशतः बाधित आहे. तर मिरज ग्रामीण मध्ये २ गावे पूर्णत: तर २ गावे अंशत: अशी ४ गावे बाधित आहेत. अप्पर सांगली (ग्रामीण) मध्ये १५ गावे अंशत: बाधित आहेत.

वाळवा तालुक्यात वाळवा येथील २ गावे पूर्णत: तर २७ गावे अंशत: अशी एकूण २९ गावे बाधित आहेत. अपर आष्टा क्षेत्रातील १ गाव पूर्णत: तर ३ गावे अंशत: अशी एकूण ४ गावे बाधित आहेत. शिराळा तालुक्यातील अंशत: १३ गावे बाधित आहेत. तर पलूस तालुक्यातील १ गाव पूर्णत: तर १९ गावे अंशत: अशी एकूण २० गावे बाधित आहेत.

सांगली पूर : विविध क्षेत्रातील स्थलांतरीत

  • मिरज तालुक्यातील महानगरपालिका क्षेत्रातील २३४ कुटुंबामधील १ हजार ००६ लोकांचे स्थलांतर.
  • मिरज ग्रामीण क्षेत्रातील ३०७ कुटुंबातील २ हजार २०७ लोकांचे स्थलांतर.
  • अपर सांगली ग्रामीण मधील १ हजार ४२४ कुटुंबातील ५ हजार ७४९ लोकांचे स्थलांतर.
  • वाळवा तालुक्यातील वाळवा क्षेत्रातील २ हजार ४५२ कुटुंबातील १४ हजार ७२५ लोकांचे स्थलांतर.
  • अपर आष्टा क्षेत्रातील ४२४ कुटुंबातील २ हजार १३५ लोकांचे स्थलांतर.
  • शिराळा तालुक्यातील ३९४ कुटुंबातील १ हजार ८४२ लोकांचे स्थलांतर.
  • पलूस तालुक्यातील २ हजार ४३६ कुटुंबातील ९ हजार ३२३ लोकांचे स्थलांतर.
 सांगली पूर
सांगली जिल्ह्यातील पूलाजवळील पाणी पातळी.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : कोल्हापूरला महापुराचा विळखा 

Back to top button