सांगली पूर - ३६ हजाराहून अधिक लोकांचे स्थलांतर : डॉ. अभिजीत चौधरी
सांगली पूर परिस्थिती अतिवृष्टीमुळे बिकट होत चालली आहे. त्यामुळे पुरपट्यातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत ७ हजार ६७१ कुटुंबातील ३६ हजार ९८७ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. याचबरोबर लहान व मोठी अशा एकूण १४ हजार ८०० जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले आहे.
सांगली पूर स्थिती :
जिल्ह्यात पूरस्थितीमुळे ६ गावे पूर्णत: बाधित आहेत. तर ८० गावे अंशत: बाधित आहेत.
यामध्ये मिरज तालुक्यात महानगरपालिका क्षेत्रातील 1 गाव अंशतः बाधित आहे. तर मिरज ग्रामीण मध्ये २ गावे पूर्णत: तर २ गावे अंशत: अशी ४ गावे बाधित आहेत. अप्पर सांगली (ग्रामीण) मध्ये १५ गावे अंशत: बाधित आहेत.
वाळवा तालुक्यात वाळवा येथील २ गावे पूर्णत: तर २७ गावे अंशत: अशी एकूण २९ गावे बाधित आहेत. अपर आष्टा क्षेत्रातील १ गाव पूर्णत: तर ३ गावे अंशत: अशी एकूण ४ गावे बाधित आहेत. शिराळा तालुक्यातील अंशत: १३ गावे बाधित आहेत. तर पलूस तालुक्यातील १ गाव पूर्णत: तर १९ गावे अंशत: अशी एकूण २० गावे बाधित आहेत.
सांगली पूर : विविध क्षेत्रातील स्थलांतरीत
- मिरज तालुक्यातील महानगरपालिका क्षेत्रातील २३४ कुटुंबामधील १ हजार ००६ लोकांचे स्थलांतर.
- मिरज ग्रामीण क्षेत्रातील ३०७ कुटुंबातील २ हजार २०७ लोकांचे स्थलांतर.
- अपर सांगली ग्रामीण मधील १ हजार ४२४ कुटुंबातील ५ हजार ७४९ लोकांचे स्थलांतर.
- वाळवा तालुक्यातील वाळवा क्षेत्रातील २ हजार ४५२ कुटुंबातील १४ हजार ७२५ लोकांचे स्थलांतर.
- अपर आष्टा क्षेत्रातील ४२४ कुटुंबातील २ हजार १३५ लोकांचे स्थलांतर.
- शिराळा तालुक्यातील ३९४ कुटुंबातील १ हजार ८४२ लोकांचे स्थलांतर.
- पलूस तालुक्यातील २ हजार ४३६ कुटुंबातील ९ हजार ३२३ लोकांचे स्थलांतर.
हेही वाचले का?
- राधानगरी : कुपले कुटुंबीयांवर कोसळली मृत्युची दरड
- अतिवृष्टी : सांगली जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर, हजारो लोकांचे स्थलांतर
- महाड-तळीये गावात दरड कोसळून ४९ जणांचा मृत्यू
- कोल्हापूर महापूर : राधानगरी धरणातून १४२५ क्युसेक विसर्ग
- कोल्हापूर महापूर : राधानगरी धरणातून १४२५ क्युसेक विसर्ग
पाहा व्हिडिओ : कोल्हापूरला महापुराचा विळखा