Shivkalin Water Management: पाणीटंचाईवर शिवकालीन जलव्यवस्थापनाचा मंत्र; गड-किल्ल्यांची दूरदृष्टी ठरते मार्गदर्शक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जलसंधारण पद्धतीतून शाश्वत उपायांची नव्याने चर्चा
Shivkalin Water Management
Shivkalin Water ManagementPudhari
Published on
Updated on

महाड : श्रीकृष्ण बाळ

राज्यातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शिवकालीन जलव्यवस्थापन पद्धतीचा आदर्श पुन्हा समोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या राज्यातील विविध गड-किल्ल्यांवर बांधलेले पाण्याचे तलाव, टाकी आणि साठे आजही त्यांच्या दूरदर्शी नियोजनाची साक्ष देतात. शेकडो वर्षांनंतरही अनेक किल्ल्यांवर पावसाचे पाणी साठवून वर्षभर उपलब्ध राहते, ही बाब विशेष उल्लेखनीय मानली जाते.

Shivkalin Water Management
Matheran Cleanliness Drive: माथेरानमध्ये ६५० श्रीसदस्यांची भव्य स्वच्छता मोहीम; पाच ते सहा टन कचऱ्याचे संकलन

इतिहास अभ्यासकांच्या मते, शिवकालीन जलसंधारण ही केवळ तात्पुरती उपाययोजना नव्हती, तर ती दीर्घकालीन आणि शाश्वत जलव्यवस्थापन प्रणाली होती. डोंगरमाथ्यावर पावसाचे पाणी अडवून दगडी बांधकामातील तलावांमध्ये साठवले जात असे. नैसर्गिक उताराचा अभ्यास करून पाण्याचा योग्य निचरा आणि साठवण यांची सांगड घातली जात होती. त्यामुळे अल्प पावसातही किल्ल्यांवर मुबलक पाणी उपलब्ध राहत असे.

Shivkalin Water Management
Raigad Shimga Holi Festival: रायगडमध्ये ४,०८० होळ्यांची उभारणी; शिमगोत्सव-धुळवडीसाठी जिल्हा सज्ज

याच धर्तीवर तालुक्याच्या ग्रामीण भागात नवे प्रयोग करण्याची गरज व्यक्त होत आहे. अनेक गावांमध्ये विहिरी व बोअरवेल कोरड्या पडत असून, भूजल पातळी झपाट्याने खाली जात आहे. अशा परिस्थितीत गावाजवळील डोंगरावर शिवकालीन पद्धतीचा तलाव उभारल्यास पावसाळ्यात पाणी साठवून ते गुरुत्वाकर्षणाच्या (ग्रॅव्हिटी) साहाय्याने थेट गावात पुरवता येऊ शकते. यामुळे विजेवरील खर्च कमी होईल तसेच पाणीपुरवठा अधिक नियमित होऊ शकतो.

Shivkalin Water Management
Mangaon Shimga Festival: माणगावात शिमगोत्सवाची रंगत वाढली; लोककलांच्या खेळ्यांनी गावागावांत उत्साहाची उधळण

तज्ज्ञांच्या मते, या योजनेसाठी प्रथम भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण, पर्जन्यमानाचा अभ्यास आणि जलवाहिन्यांचे नियोजन आवश्यक आहे. पारंपरिक दगडी बांधकामासोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास तलाव अधिक टिकाऊ बनू शकतात. तसेच जलसंधारणाबाबत ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.

Shivkalin Water Management
Mahad Khadipatta Water Crisis: महाड खाडीपट्ट्यात पाणीटंचाईचा कहर; शिमगोत्सवात गोमेंडीतील ग्रामस्थ पाण्याविना तहानलेले

राज्यात जलयुक्त शिवारसारख्या योजनांनंतर आता ऐतिहासिक वारशातून प्रेरणा घेत स्थानिक पातळीवर शाश्वत उपाययोजना राबविण्याची मागणी वाढत आहे. शिवकालीन जलव्यवस्थापनाचा आदर्श आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडला गेला, तर पाणीटंचाईवर प्रभावी आणि दीर्घकालीन मात करणे शक्य होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news