Raigad Chaitra Vasantotsav: चैत्र आगमनाने रायगडात वसंतोत्सवाची रंगत; निसर्ग, संस्कृती आणि परंपरेचा सुंदर संगम

गुढीपाडव्यानंतर गावागावांत धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम; आंबा, काजू हंगामामुळे बाजारपेठेतही उत्साह
Raigad Chaitra Vasantotsav
Raigad Chaitra VasantotsavPudhari
Published on
Updated on

अलिबाग : सुवर्णा दिवेकर

चैत्र महिन्याच्या आगमनाने रायगड जिल्ह्यात सर्वत्र वसंतोत्सवाचा बहर पाहायला मिळत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नववर्षाचे स्वागत केल्यानंतर आता ग्रामीण आणि शहरी भागात निसर्गासह सांस्कृतिक उत्सवांची रंगत अधिक वाढू लागली आहे. झाडांना नवीन पालवी फुटली असून आंबा, काजू, फणस यांसारख्या फळबागांमध्येही बहर दिसून येत आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर हिरवागार आणि प्रसन्न झाला आहे.

Raigad Chaitra Vasantotsav
Karjat Jal Jeevan Mission Fail: कर्जतमध्ये ‌‘हर घर नल‌ से जल‌’ स्वप्न अपूर्णच; तालुक्यातील निम्म्याहून अधिक योजना रखडलेल्या

गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक घरासमोर उभारण्यात आलेल्या गुढ्यांमुळे सणाचा आनंद द्विगुणित झाला होता. त्यानंतर आता चैत्रातील विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. गावागावातील मंदिरांमध्ये कीर्तन, भजन, हरिपाठ यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन होत असून भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. महिलांमध्ये हळदीकुंकू कार्यक्रम, तर युवकांमध्ये क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक उपक्रमांची लगबग वाढली आहे.

रायगडातील ग्रामीण भागात वसंतोत्सवाचा खास प्रभाव दिसून येतो. शेतांमध्ये उभी पिके, फुललेल्या बागा आणि मंद वाऱ्यामुळे वातावरण अधिकच आल्हाददायक झाले आहे. सकाळी आणि संध्याकाळी थंडावा जाणवत असला तरी दुपारच्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे. तरीही या ऋतूतील सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत.

Raigad Chaitra Vasantotsav
Diveagar Siddhanath Kedarnath Yatra: दिवेआगर नगरीत यात्रेची लगबग सुरु; 31 मार्च ते 1 एप्रिलला भरणार यात्रा; ‘गळी फिरणे’ पाहण्यासाठी भाविकांची उत्सुकता

याच काळात आंबा हंगामाची चाहूल लागल्याने बाजारपेठांमध्येही हालचाल वाढली आहे. हापूस आंब्याचा सुगंध दरवळू लागला असून शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तसेच काजू प्रक्रियेच्या उद्योगालाही वेग आला आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेला या हंगामामुळे मोठा हातभार लागतो. शाळा-कॉलेजांमध्येही परीक्षांचा हंगाम सुरू असतानाच विद्यार्थ्यांमध्ये सणाचा उत्साह टिकून आहे.

Raigad Chaitra Vasantotsav
Raigad Plantation Scam: चिंचोटी वनघोटाळ्यातील आरोपींवर कारवाईची टांगती तलवार

निसर्ग, संस्कृती आणि परंपरेचा सुंदर संगम

एकूणच, चैत्राच्या आगमनाने रायगड जिल्ह्यात निसर्ग, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळत आहे. गुढीपाडव्यानंतर सुरू झालेला हा वसंतोत्सव येत्या काही दिवसांत अधिकच रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news