रायगड: विन्हेरे रेल्वे स्थानकावर ८ तासांपासून मस्त्यगंधा एक्सप्रेस खोळंबली

सकाळी 6 वाजल्यापासून प्रवाशी तिष्ठत बसले आहेत. जवळपास सहा तासांपासून या प्रवाशांना पिण्याचे पाणी मिळालेले नाही. अनेक प्रवाशांची उपासमार झाली. सुमारे दीड ते दोन हजार प्रवासी अडकून पडले आहेत. स्थानिक नागरिक आणि सेवाभावी संघटनांनी प्रवाशांसाठी पाणी, बिस्कीट, नाष्ट्याची व्यवस्था केली. तर विन्हेरे रेल्वे प्रशासनाने पाण्याची तसेच लहान मुलांसाठी दुधाची व्यवस्था केली. पनवेल मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी बससह खासगी वाहतूक उपलब्ध करून देण्यात आली. दरम्यान, ही एक्सप्रेस रद्द झाली नसून पुढील सूचना आल्यानंतर मार्गस्थ होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
हेही वाचा
- रायगड : कोकण रेल्वे ठप्प, आंबेवाडी नाक्यावर एसटीसाठी प्रवाशांची गर्दी
- रायगड: नागोठणे रेल्वे स्थानकात चाकरमानी अडकले; प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण
- रायगड: वीर रेल्वे स्टेशनवर अडकलेल्या प्रवाशांसाठी प्रशासनाची मदत