

वेळेबाबत सुवर्णमध्य काढावाबहुतांश शाळा एसएससी बोर्डाच्या आहेत. ज्या दोन सत्रात चालतात. यांना वीस ते तीस वर्षांपूर्वी परवानगी मिळालेली आहे. नवीन वेळेविषयीचे परिपत्रक सादर करण्यापूर्वी शाळांच्या भौतिक सुविधा आणि वर्गखोल्या याबाबत संबंधित संस्थांकडून माहिती मागवून घेणे गरजेचे होते. जो अध्यादेश आहे त्याचा मुलांच्या लवकर उठण्यावर काय परिणाम होईल याचा विचार करावा. सकाळी नऊऐवजी आठ वाजताची वेळ ठरवणे योग्य होईल. त्यामुळे सर्व शाळांना विचारात घेऊन याबाबत सुवर्णमध्य काढावा.– राजेंद्र सिंग,सचिव, ईसा संघटना महाराष्ट्रस्कूल बसेसच्या फेर्या कमी कराव्या लागतीलशाळांची वेळ बदलली ही स्वागतार्ह बाब आहे. पण ज्या गाड्या दोन सत्रांमध्ये विद्यार्थी ने – आण करण्याचे काम करतात. त्यांना एक शाळा बंद करावी लागेल. त्यामुळे स्कूल बसचालकांचे उत्पन्न कमी होणार आहे. त्यामुळे नाईलाजाने भाडेवाढ करावी लागेल. हा आर्थिक बोजा पालकांवर पडेल. पालकांनाही बसचे भाडे परवडणार नाही.-मोहन जाधव, उपाध्यक्ष, अखिल महाराष्ट्र विद्यार्थी वाहतूक महासंघ पिं.चि.शासनाने घेतलेला निर्णय हा पूर्व प्राथमिकसाठी योग्य आहे. ती मुले खूपच लहान असतात. तसेच वेळ बदलल्याने स्कूल बसचे भाडे वाढू शकेल. कारण बसचालक एवढ्या फेर्या मारणार नाहीत; तसेच वेळ बदलल्याने शाळा अभ्यासक्रम कसा पूर्ण करतील, असाही प्रश्न निर्माण होत आहे.– अशिष जोशी, पालकसरसकट शाळांची वेळ बदलता येणार नाहीशिक्षण आयुक्तांनी शाळांची वेळ बदण्याचे जाहीर केले आहे. पण शासन निर्णयात त्यांनी हेदेखील स्पष्ट केले आहे. ज्या शाळांना काही अपरिहार्य कारणास्तव वेळ बदलता येत नसेल त्यांना सूट देण्यात येणार आहे. याबाबत पालिका शाळांचे सर्वेक्षण करावे लागेल. सरसकट शाळांची वेळ बदलता येणार नाही, कारण भौतिक सुविधा एका दिवसात उभ्या करता येत नाहीत.– विजयकुमार थोरात, सहाय्यक आयुक्त, पिं.चिं. शिक्षण विभाग
हेही वाचा