पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील कमाल तापमानात शनिवारपासून 3 ते 4 अंशांनी वाढ झाली आहे. सरासरी कमाल तापमान 37 ते 38 अंशांवर गेले आहे. मराठवाडा व विदर्भातच दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील सर्वच भागात पावसाचा इशारा देण्यात आला होता. मात्र शनिवारी राज्यात कुठेही पावसाची नोंद झाली नाही. उलट कमाल तापमानात मोठी वाढ झाली. पारा 37 ते 38 अंशांवर गेला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. मात्र मराठवाडा भागात 11 तर विदर्भात 11 व 12 फेब्रुवारी रोजी हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
पुणे 12.4, अहमदनगर 13.5, जळगाव 13.5, कोल्हापूर 18.6, महाबळेश्वर 16, मालेगाव 14.2, नाशिक 12.8 सांगली 18.3, सातारा 13, सोलापूर 21, धाराशिव 20.9, छत्रपती संभाजीनगर 15.6, नागपूर 16,चंद्रपूर 16.
हेही वाचा