विजय जगदाळे
भोसरी (पुणे) : चक्रपाणी वसाहत येथील विश्वकर्मा कॉलनी नंबर 2 मधील रास्ता अनेक वर्षांपासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. हद्दीच्या वादामुळे परिसरातील नागरिकांना पालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका सहन करावा लागत आहे.
शास्त्री चौकातून चक्रपाणी वसाहतीकडे जाणारा रस्ता असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ असते. पालिका प्रशासनाने हद्दीचा वाद न घालता रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे. चक्रपाणी वसाहत येथील विश्वकर्मा कॉलनी नंबर 2, प्रभाग क्रमांक तीन (चर्होली-मोशी) व प्रभाग क्रमांक सहा (धावडेवस्ती-चक्रपाणी) या दोन प्रभागांमधील रस्ता आहे. या दोन प्रभागांमधील हद्दीच्या वादामुळे रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. मुरकुटे कॉर्नर ते चक्रपाणी वसाहतीला दोन प्रभागाला जोडणारा रस्ता आहे. पालिका प्रशासन हद्दीचा वाद पुढे करीत डांबरीकरण कोणी करायचे? या वादात अनेक वर्षांपासून परिसरात डांबरीकरण केले नसल्याचे संतप्त नागरिक व्यक्त करीत आहेत.
शास्त्री चौकाला जोडणारा हा रस्ता असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची तसेच वाहनांची मोठी वर्दळ असते. परिसरात अनेक शाळा आहेत. शालेय विद्यार्थी तसेच पालकांनादेखील ये-जा करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. महापालिका अधिकार्यांच्या समन्वयअभावी या रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
महापालिकेच्या वतीने चेंबर दुरुस्तीसाठी रस्ता खोदण्यात आला होता. खोदण्यात आलेल्या रस्त्यावर महापालिकेच्या वतीने खडी टाकण्यात आली होती. खडी टाकण्यात आल्याने नागरिकांना अधिकच मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहने रस्त्यावरून ये-जा करताना परिसरातील अनेक नागरिकांना दगड उडून दुखापत झाली आहे. तसेच, वाहनांमुळे परिसरातील घराच्या खिडकीच्या काचादेखील फुटल्या असल्याचे नागरिक सांगतात. भीक नको पण कुत्रा आवर, अशी परिस्थिती विश्वकर्मा कॉलनीमधील रहिवाशांची झाली आहे.
रस्त्याचे डांबरीकरण न झाल्याने स्थानिक नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने हद्दीचा वादा पुढे करीत डांबरीकरण केले नाही. पालिकेने तात्पुरता स्वरूपात टाकलेल्या खडीमुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
-बळवंत दातकर, स्थानिक नागरिकयाबाबतचे निवेदन महापालिकेच्या इ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकार्यांना महिलांनी दिले होते. परंतु, परिस्थिती सुधारणा झाली नाही. साफसफाई करताना अनेकदा खडी उडून महिलाना दुखापत झाली आहे. संबंधित अधिकारी सांगतात आमच्या हद्दीत तुमचा भाग येत नाही. आम्ही काय करायचे.
– मीनाक्षी पाटील, गृहिणीअधिकारी टोलवाटोलवी करतात. विकासकामे करताना हद्दीचा वाद कशाला आला पाहिजे. पालिका प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे.
– संदीप पाळंदे, नागरिकपरिसरात ड्रेनेज कामकाज केल्याने रस्ता खराब झाला आहे. लवकरच रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल.
– वृषाली पोतदार, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य विभाग
हेही वाचा: