Maharashtra Monsoon: 5 जुलै पासून राज्यात जोर वाढणार; पूर, भूस्खलनाचा धोका?

जुलै मध्ये बरसणार सरासरी 280 मिलीमिटर पाऊस : हवामान विभागाचा 106 टक्यांचा अंदाज जाहीर
Maharashtra Monsoon: 5 जुलै पासून राज्यात जोर वाढणार; पूर, भूस्खलनाचा धोका?
Published on
Updated on

पुणेः देशात जुलै महिन्यात सुमारे 280.4 मिलीमिटर (106 टक्के ) पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहिर केला आहे. मान्सून लवकरच हिमालयाच्या पायथ्याशी स्थिर होत आहे.त्यामुळे जुलै महिन्यात सर्वत्र सरासरी पेक्षा जास्त पाऊस होईल.

हवामान विभागाने जुलै महिन्याचा स्वतंत्र अंदाज जाहीर केला. यात म्हटले आहे की, भौगोलिकदृष्ट्या देशाच्या बहुतेक भागात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, ईशान्य आणि पूर्व भारत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भाग आणि वायव्य भारताच्या काही भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान, विषुववृत्तीय पॅसिफिक प्रदेशात सध्या सकारात्मक स्थिती भारतीय मान्सूनसाठी अनुकूल आहे.त्यामुळे या महिन्यात देशात चांगल्या पावसाची शक्यता आहे.

Maharashtra Monsoon: 5 जुलै पासून राज्यात जोर वाढणार; पूर, भूस्खलनाचा धोका?
Maharashtra Rain Alert | १ जुलैपासून चार दिवस 29 जिल्ह्यांना पावसाचा इशारा

अंदाजातील ठळक मुद्दे..

जुलै मध्ये संपूर्ण देशभरात पाऊस सामान्यपेक्षा जास्त 106 टक्के जास्त

( दीर्घकालीन सरासरी )

हवामान विभागाने 1971 ते 2020 च्या आकडेवारीनुसार जुलै मध्ये 280.4 मिमी पाऊस पडेल सामान्यपेक्षा जास्त पाऊस शेती आणि जलसंपत्तीला महत्त्वपूर्ण फायदे देऊ शकतो, परंतु पूर, भूस्खलन, पृष्ठभागावरील वाहतूक व्यत्यय, सार्वजनिक आरोग्य आव्हाने आणि परिसंस्थेला होणारे नुकसान यासारखे संभाव्य धोके देखील आणतो.

या जोखमींचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी, पायाभूत सुविधा मजबूत करणे, याच्या पूर्वसूचनेचा वापर करणे, देखरेख आणि देखरेख प्रयत्न वाढवणे आणि असुरक्षित भागात मजबूत प्रतिसाद प्रणाली स्थापित करणे आवश्यक आहे

Maharashtra Monsoon: 5 जुलै पासून राज्यात जोर वाढणार; पूर, भूस्खलनाचा धोका?
Maharashtra Monsoon 2025 | महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार IMD चा इशारा, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

5 जुलै पासून राज्यात जोर वाढणार...

राज्यात सध्या कोकणात पावसाचा जोर आहे. तर मध्य, उत्तर महाराष्ट्र अन विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मात्र 5 जुलै पासून सर्वंत्र जोर वाढणार आहे. सध्या राज्यात 29 जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यात 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर 19 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर, पुणे आणि सातारा घाट माथ्याला 2 ते 4 जुलै पर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news