शहराचा आकार, लोकसंख्या आणि वाहनांची वाढती संख्या विचारात घेऊन महापालिकेकडून नागरिकांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना केल्या जातात. वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्य शहरासह उपनगरांमध्ये उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर आणि लहान-मोठ्या लांबीचे आणि रुंदीचे रस्ते विकसित केले जातात. मात्र, दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने कोंडीत भर पडत आहे.