महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर म्हणजेच सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केला होता. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने ज्याठिकाणी पाऊस नसतो, त्याठिकाणी निवडणुका आत्ता घ्याव्यात. तसेच मुंबई कोकणसह ज्याठिकाणी पाऊस असतो, अशा निवडणुका पावसाळ्यानंतर घ्याव्यात, असे निर्देश दिले असून त्यासंबंधीचे अधिकारही आयोगाला दिले आहेत.