

पुणे: होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरी होणारी धुळवड म्हणजे खवय्यांसाठी चिकन, मटण आणि मासळीच्या मेजवानीचा दिवस. मात्र, यंदा धुळवडीलाच खग््राास चंद्रग््राहण आणि पौर्णिमा आल्याने मांसाहारप्रेमींच्या उत्साहावर काहीसे सावट पाहायला मिळाले. धार्मिक कारणामुळे दिवसभर मांसाहारी पदार्थांच्या मागणीत मोठी घट झाली असली तरी सायंकाळी ग््राहण सुटल्यानंतर मात्र बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी ग््रााहकांची झुंबड उडाली.
पुणे शहर बॉयलर असोसिएशनचे संचालक रुपेश परदेशी म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दरवर्षी धुळवडीला सुमारे 1,100 टन चिकनची विक्री होते. मात्र, यंदा हे प्रमाण केवळ 700 टनांवर स्थिरावले. विक्रेत्यांनी आधीच कमी माल भरल्याने टंचाई जाणवली आणि परिणामी चिकनच्या दरात किलोमागे 10 रुपयांची वाढ होऊन तो 240 रुपयांवर पोहोचला.
मटण विक्रेते संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे म्हणाले, मटण मार्केटमध्ये दररोजच्या तुलनेत 1,000 ते 1,200 बोकडांची आवक झाली. मटणाचे दर 800 रुपये प्रतिकिलोवर स्थिर राहिले. मासळी बाजारातही आंध प्रदेश आणि स्थानिक भागातून 25 ते 30 टन आवक झाली. मात्र, सकाळच्या सत्रात मागणी नसल्याने मासळीचे भाव वाढले नाहीत.
खोल समुद्र, नदी, खाडी तसेच आंध प्रदेश येथून रहू, कतला, सिलनची मिळून गणेश पेठेतील बाजारात 25 ते 30 टन मासळीची आवक झाली. ही आवक नेहमीच्या प्रमाणात आहे. धुळवडमुळे जास्त आवक झाली नाही. मागणीही कमीच आहे. मासळीचे भाव स्थिर असल्याचे मासळीचे व्यापारी ठाकुर परदेशी यांनी सांगितले.
दिवसभर पौर्णिमा आणि चंद्रग््राहण पाळणाऱ्या नागरिकांनी सायंकाळी 6 नंतर चिकन आणि मटण दुकानांवर गर्दी केली. सकाळी ग््रााहकांची संख्या तुरळक होती. मात्र, ग््राहण सुटताच मागणीत वाढ झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.