![पुणे : डाळींब, पपई, कलिंगड, खरबूज महागले](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F01%2FDalimb.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे : राज्यासह परराज्यातून आंब्याची आवक घटल्याने बाजारात अन्य फळांच्या खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्यात उन्हाच्या कडाक्याने पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने डाळींब, पपई, कलिंगड, खरबूज आदी फळांच्या उत्पादनात घट झाली आहे. परिणामी, या फळांची बाजारातील आवकही घटली आहेत.
बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत आवक कमी असल्याने डाळिंबाच्या भावात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, उन्हाचा चटक्यामुळे मागणी वाढल्याने कलिंगड व खरबुजाच्या भावात किलोमागे पाच रुपये तर पपईच्या भावात दोन रुपयांनी वाढ झाली आहे. मागणीअभावी पपईचे भाव किलोमागे दोन रुपयांनी उतरले आहेत. उर्वरित सर्व फळांची आवक जावक कायम असून दर टिकून आहेत.
रविवारी (दि. 11) मार्केट यार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस 6 ट्रक, मोसंबी 10 टन, डाळींब 25 ते 30 टन, पपई 5 ते 6 टेम्पो, लिंबांची सुमारे एक हजार ते बाराशे गोणी, कलिंगड 3 ते 4 टेम्पो, खरबूज 2 ते 3 टेम्पो, पेरू 250 ते 500 क्रेट् स, चिकू एक हजार डाग, गावरान आंबा 5 ते 6 टन, हापूस आंबा अडीच ते तीन हजार पेटी, कर्नाटक आंब्याची दोन हजार पेटी व बॉक्सची आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : 200-500, मोसंबी : (3 डझन) : 350-450, (4 डझन) : 200-280, संत्रा : (10किलो) : 300-1200, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 50-225, गणेश : 5-25, आरक्ता 30-120, कलिंगड : 18-25, खरबूज : 20-30, पपई : 8-15, अननस (एक डझन) : 200-500, पेरू (वीस किलो) : 250-450, चिकू (दहा किलो) : 100-500, अंजीर (1 किलो) : 20-100, आंबा : रत्नागिरी हापूस : तयार 4 ते 8 डझन : 1500-3000. कर्नाटक : कच्चा हापूस (1 डझन) 400-500 (1 किलो) 60-80, पायरी (1 डझन) 250-300 (1 किलो) 40-60, लालबाग (1 किलो) 25-40, बदाम/बैगनपल्ली (1 किलो) 30-40.
हेही वाचा