Pimpri News : ‘रेल्वे पुलाखाली पाणी; वाहनचालक त्रस्त

Pimpri News : ‘रेल्वे पुलाखाली पाणी; वाहनचालक त्रस्त

कामशेत : पुढारी वृत्तसेवा : येथील रेल्वे पुलाखाली पाणी साचल्याने वळख व वडिवळे, सांगिसे, नेसावे, खांडशी, वेलवळी येथे ये-जा करणार्‍यांची गैरसोय होत आहे. त्यातच रेल्वेचे गेट बंद असल्यामुळे चालकांना पाण्यातून वाहने घेऊन जावे लागत आहे.

वाहन चालविताना चालकांनी कसरत

मुळात हा रेल्वे पूल चुकीच्या पद्धतीने बांधला असल्यामुळे नागरिकांनी आतापर्यंत अनेक वेळा आंदोलन केले आहे. रेल्वे प्रशासनालाही निवेदन दिले आहे. तरीही रेल्वे प्रशासनाने याची दखल घेत नसल्यामुभळे वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या पावसाळा नसतानाही रेल्वे पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे चालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news