सेवानिवृत्त झालेल्या न्यायाधीशांच्या जागी नव्या न्यायाधीशांची नियुक्ती त्वरित होण्याची आवश्यकता आहे. सद्य:स्थितीत न्यायालयात दाव्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे, एका न्यायालयाचा कारभार अन्य न्यायालयाकडे सोपवून काही साध्य होणार नाही. याउलट प्रलंबित दाव्यांच्या संख्येत वाढ होत राहील. न्यायालयाची गरज ओळखून संबंधित प्रशासनाने रिक्त जागा त्वरीत भरून सुनावणीचा मार्ग सुकर करून द्यावा.
– अॅड. अजिंक्य मिरगळ, फौजदारी वकील.
सद्य:स्थितीत न्यायालयातील प्रत्येक कोर्टात प्रलंबित खटल्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे, प्रशासनाने प्रभारी नेमणूक न करता पूर्णवेळ न्यायाधीशांची नेमणूक करण्याची आवश्यकता आहे . जेणेकरून न्यायालयाचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू राहील.
– अॅड. विष्णु अंभुरे पाटील, फौजदारी वकील