पुणे -सोलापूर महामार्गावर रिक्षाला अपघात, ९ विद्यार्थी जखमी

पुणे -सोलापूर महामार्गावर रिक्षाला अपघात, ९ विद्यार्थी जखमी
Published on
Updated on

यवत; पुढारी वृत्तसेवा: दौंड तालुक्यातील बोरिएंदी गावातील व परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला पुणे -सोलापूर महामार्गावर अपघात झाला. हा अपघात यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत खेडेकर मळा येथे सोमवारी (दि.११) रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. यात एकूण नऊ मुले जखमी झाली आहेत. ७ मुली तर दोन मुलांचा यात समावेश आहे.

हे सर्व विद्यार्थी उरली कांचनमधील महात्मा गांधी शाळेचे विद्यार्थी असल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमी विद्यार्थ्यांना उरळी कांचनमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी यवत पोलिसांनी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे. या अपघातानंतर पुन्हा एकदा शालेय विद्यार्थी वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news